शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अखेर गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 11:23 PM

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : परिसरातील पुराचा धोका कमी होणार

नाशिक- २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुन्हा पुराचा धोका उद‌्भवू नये, यासाठी अखेरीस स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. होळकर पूल ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत गाळ काढण्यात येत असून त्यामुळे पात्र खोल होईल आणि पाणी प्रवाही होण्यास मदत होणार आहे.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या कामाला गुरुवारपासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. ३.२ किलोमीटर अंतरातील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी या टप्प्यातील पाणी रोखण्यात आले. प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सध्या विविध कामे सुरू असून त्यात गोदावरी नदीकाठाचे सुशोभिकरण, पायाभूत सुविधा आणि ट्रॅश स्कीमरच्या मदतीने नदीची स्वच्छता करताना होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तळ काँक्रिटीकरण हटवण्याबरोबरच गोदापात्रातील गाळदेखील काढण्यात येणार आहे. नऊ कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे.महापालिकेने यापूर्वी गोदावरी नदीवर पूल बांधताना आणि जलवाहिनी नेताना नदीपात्रात कॉफर डॅम (मातीचा बंधारा) बांधला होता. त्यामुळे नदीपात्रात गाळ साचला आहे. गाळ साचल्याने नदीपात्र उथळ झाले आहेत. २००८ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यामागे अनेक कारणांपैकी या परिसरातील गाळ हे देखील कारण होते. परंतु पुरामुळे या परिसरात जलसंपदा विभागाने आखलेली पूररेषा ही आणखीनच अडचणीची ठरली होती. या पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या अंगिकृत संस्थेने ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यात नदीपात्रातील गाळ काढण्याचीदेखील शिफारस केली होती. आता हे काम सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ होणार असले तरी पूररेषा कमी होण्यास मदत होणार आहे.नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे नदीपात्र विस्तृत होईल, खोली वाढेल तसेच वहन क्षमतादेखील वाढणार आहे. त्यामुळे परिसरात पुराचा धोका कमी होईल. विशेषत: होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत मॅकेनिकल गेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे गाळ काढलेले पाणी नेमके टप्प्यात येऊन पुराचा धोका कमी होईल, असे स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी सांगितले.स्मार्ट सिटी कंपनीने नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर तो ठेवण्यासाठी एक जागा निश्चित केली असून आणखी दोन जागादेखील निवडल्या जाणार आहेत. मात्र, शेतीसाठी गाळ उपयुक्त असल्याने तो नेण्याचे आवाहन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका