शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

...अखेर जाखोरीमध्ये बिबट्या जेरबंद; दारणाकाठाला मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 23:09 IST

मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले.

ठळक मुद्देभय कमी होण्यास मदत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नआपल्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घ्यावी

नाशिक : दारणानदीकाठालगतच्या पंचक्रोशीत मागील महिनाभरापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत होती. जाखोरी गावात अखेर गुरूवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास एक प्रौढ बिबट्यावनविभागाने लावलेल्या पिंजºयात जेरबंद झाला. या गावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वरमध्ये काही दिवसापुंर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जाखोरीत जेरबंद झालेल्या बिबट्यामुळे काही प्रमाणात दारणाकाठाच्या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बारामाही वाहणा-या दारणा-गोदावरी नदीचे प्रशस्त खोरे आणि नगदी पीक ऊसाची विस्तीर्ण लागवड यामुळे बिबट्यांना या भागातील गावांमध्ये पोषक असे वातावरण मिळाले आणि बिबट्यांची संख्या वाढू लागल्याचे निदर्शनास आले. मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले. यामुळे या भागातील गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप अन् भीतीचे वातावरण तयार झाले होते. मागील दोन महिन्यांपासून नाशिक पश्चिम वनविभागाचे बचावपथक दिवसरात्र एक करून विविध उपाययोजना राबवित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना गुरूवारी रात्री जाखोरीत यश मिळाले. दोन दिवसांपुर्वी येथील शेतकरी बबलू सय्यद यांच्या गट क्रमांक २८५मध्ये वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, रेस्क्यू वाहनचालक प्रवीण राठोड, इको-एको वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक यांनी स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिबट्याचा माग काढत पिंजरा दोन दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनीही पाहणी करून पिंजºयाची जागा योग्य असून यामध्ये बोकड सावज ठेवण्याची सुचना केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आणि अखेर जाखोरी गावात वनविभागाला अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले.

गावक-यांची भरली जत्राजाखोरी गावात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पंचक्रोशीत वाºयासारखी पसरली. पिंजºयात आलेला बिबट्या बघण्यासाठी आजुबाजुच्या लोकवस्तीवरील गावकºयांनी एकच धाव घेतली. यामुळे जणू या शेतात रात्रीच्या वेळी बघ्यांची जत्रा भरल्याचे चित्र होते. बिबट्याचा पिंजरा तत्काळ रेस्क्यू वाहनातून शासनाच्या रोपवाटिकेत हलविण्यात आला.

--वनविभाग त्यांच्यापरीने सर्वच उपाययोजना आणि प्रयत्न करत आहेत. गावक-यांनी आपल्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घ्यावी. या भागात तीन नव्हे तर चार पथके सातत्याने तळ ठोकून आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, केवळ संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नये, आणि बिबट्याकडून संभाव्य मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. जाखोरी गावात पुन्हा नव्याने दुसरा पिंजराही तत्काळ लावण्यात आला आहे.-शिवाजी फुले, उपवनसंरक्षक

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव