शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भरधाव कारची नऊ मुलांना धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:58 IST

कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़

ठळक मुद्देसाईनाथनगर चौक : कालिकेच्या दर्शनासाठी जात असताना घडली घटना

इंदिरानगर : कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या नऊ मुलांना भरधाव कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१४) पहाटेच्या सुमारास साईनाथनगर चौफुलीजवळ घडली़ विशाल नामदेव पवार (११, रा़ वडाळागाव, कोळीवाडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, दोघा गंभीर जखमींपैकी एकावर खासगी रुग्णालयात तर दुसऱ्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फरार कारचालकाचा शोध सुरू आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील कोळीवाडा येथील १० ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुले पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी पायी जात होते़ साईनाथनगर चौफुलीजवळून ही मुले जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या लाल रंगाच्या कारने या मुलांना जोराची धडक दिली़ या धडकेमध्ये विशाल नामदेव पवार (११), साहिल खंडू कडाळे (१४), रोहन बापू मोरे (१२), कृष्णा दत्तू खोडे (९), राहुल बापू मोरे (१५), अश्विन दत्तू खोडे (१४), ऋषिकेश सुनील वाघ (१०), तुषार गोविंद खाडम (१५) हे जखमी झाले़ यापैकी गंभीर जखमी असलेल्या विशाल पवारचा मृत्यू झाला तर तुषार खाडम याच्यावर खासगी रुग्णालयात तर कृष्णा खोडे व इतर जखमींवर जिल्हा रुग्णाालयात उपचार सुरू आहेत़या अपघातानंतर कारचालक फरार झाला तर पहाटेची वेळ असल्याने जखमी मुलांना मदत मिळण्यास उशीर झाला़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाच्या वाहनात काही जखमी मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे वडाळागाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़दोघांना दुचाकीवरून रुग्णालयात हलविलेरुग्णवाहिका अखेरपर्यंत आलीच नाहीपहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास अपघात घडला. साडेतीन वाजेपर्यंत सर्व जखमी मुले रस्त्यावरच पडून होती. पोलिसांची गाडी घटनास्थळी आली आणि त्यांनी नातेवाइकांना रुग्णवाहिका येत असल्याचे सांगितले, मात्र अखेरपर्यंत रुग्णवाहिका तेथे पोहचलीच नाही. नातेवाइकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पोलिसांना विनवणी करत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी चार जखमी मुलांना वाहनातून रुग्णालयात दाखल केले तर उर्वरित तिघांना नातेवाइकांनी दुचाकीवरून रुग्णालयात हलविले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू