शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

By अझहर शेख | Updated: September 25, 2018 00:36 IST

‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्टतील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व तेथील भूभागावर रानफुलांचे ताटवे बहरले आहेत. वृक्षसंपदेने नटलेले कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांच्या नेहमीच पसंतीला उतरले आहे. पावसाळ्यात याच परिसरात विविध धबधब्यांनी आलेल्या पर्यटकांना आकर्षित केले तर आता पुन्हा निसर्गाकडून सौंदर्याची वेगळीच उधळण येथे केली जात असल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर रानफुले फुलली असून, निसर्गाचा हा पुष्पोत्सव निसर्ग छायाचित्रकारांसह पुष्पप्रेमी व फुलपाखरूप्रेमींना भुरळ घालत आहे.कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याचे क्षेत्र शेंडी गावापासून सुरू होते. भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रात विभागलेल्या या अभयारण्यात सुमारे १८ ते २० लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या सर्व गावांमध्ये नाशिक वन्यजीव विभागाने गाव परिस्थितीकीय विकास समिती गठित केली असून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत जंगल संवर्धनासाठीही प्रवृत्त केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा पुष्पोत्सव भंडारदरा परिसरात पहावयास मिळणार आहे.अशा आहेत रानफुलांच्या प्रजातीया अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची अमाप जैवविविधता या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.भंडारदरा परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात. निसर्गाची जैवविविधता अभ्यासण्याची उत्कृष्ट संधी या काळात मिळते. फुलपाखरू, मधमाशांच्या प्रजातीही दिसतात. पर्यटकांनाही या पुष्पोत्सवाचे आकर्षण असते.अकोले तालुक्यातील अखेरच्या टोकाला असलेल्या सर्वच गावांमध्ये फुलांचा बहर सध्या पहावयास मिळतो.  - रवि ठोंबाडे, गाइड, अकोले

टॅग्स :Natureनिसर्गNatural Calamityनैसर्गिक आपत्ती