शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

By अझहर शेख | Updated: September 25, 2018 00:36 IST

‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्टतील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व तेथील भूभागावर रानफुलांचे ताटवे बहरले आहेत. वृक्षसंपदेने नटलेले कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांच्या नेहमीच पसंतीला उतरले आहे. पावसाळ्यात याच परिसरात विविध धबधब्यांनी आलेल्या पर्यटकांना आकर्षित केले तर आता पुन्हा निसर्गाकडून सौंदर्याची वेगळीच उधळण येथे केली जात असल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर रानफुले फुलली असून, निसर्गाचा हा पुष्पोत्सव निसर्ग छायाचित्रकारांसह पुष्पप्रेमी व फुलपाखरूप्रेमींना भुरळ घालत आहे.कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याचे क्षेत्र शेंडी गावापासून सुरू होते. भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रात विभागलेल्या या अभयारण्यात सुमारे १८ ते २० लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या सर्व गावांमध्ये नाशिक वन्यजीव विभागाने गाव परिस्थितीकीय विकास समिती गठित केली असून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत जंगल संवर्धनासाठीही प्रवृत्त केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा पुष्पोत्सव भंडारदरा परिसरात पहावयास मिळणार आहे.अशा आहेत रानफुलांच्या प्रजातीया अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची अमाप जैवविविधता या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.भंडारदरा परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात. निसर्गाची जैवविविधता अभ्यासण्याची उत्कृष्ट संधी या काळात मिळते. फुलपाखरू, मधमाशांच्या प्रजातीही दिसतात. पर्यटकांनाही या पुष्पोत्सवाचे आकर्षण असते.अकोले तालुक्यातील अखेरच्या टोकाला असलेल्या सर्वच गावांमध्ये फुलांचा बहर सध्या पहावयास मिळतो.  - रवि ठोंबाडे, गाइड, अकोले

टॅग्स :Natureनिसर्गNatural Calamityनैसर्गिक आपत्ती