शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

By अझहर शेख | Updated: September 25, 2018 00:36 IST

‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्टतील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व तेथील भूभागावर रानफुलांचे ताटवे बहरले आहेत. वृक्षसंपदेने नटलेले कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांच्या नेहमीच पसंतीला उतरले आहे. पावसाळ्यात याच परिसरात विविध धबधब्यांनी आलेल्या पर्यटकांना आकर्षित केले तर आता पुन्हा निसर्गाकडून सौंदर्याची वेगळीच उधळण येथे केली जात असल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर रानफुले फुलली असून, निसर्गाचा हा पुष्पोत्सव निसर्ग छायाचित्रकारांसह पुष्पप्रेमी व फुलपाखरूप्रेमींना भुरळ घालत आहे.कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याचे क्षेत्र शेंडी गावापासून सुरू होते. भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रात विभागलेल्या या अभयारण्यात सुमारे १८ ते २० लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या सर्व गावांमध्ये नाशिक वन्यजीव विभागाने गाव परिस्थितीकीय विकास समिती गठित केली असून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत जंगल संवर्धनासाठीही प्रवृत्त केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा पुष्पोत्सव भंडारदरा परिसरात पहावयास मिळणार आहे.अशा आहेत रानफुलांच्या प्रजातीया अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची अमाप जैवविविधता या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.भंडारदरा परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात. निसर्गाची जैवविविधता अभ्यासण्याची उत्कृष्ट संधी या काळात मिळते. फुलपाखरू, मधमाशांच्या प्रजातीही दिसतात. पर्यटकांनाही या पुष्पोत्सवाचे आकर्षण असते.अकोले तालुक्यातील अखेरच्या टोकाला असलेल्या सर्वच गावांमध्ये फुलांचा बहर सध्या पहावयास मिळतो.  - रवि ठोंबाडे, गाइड, अकोले

टॅग्स :Natureनिसर्गNatural Calamityनैसर्गिक आपत्ती