शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हरिहर किल्ल्यावरून पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:04 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देपर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील रूपाली ज्ञानेश्वर चौधरी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली या आपल्या कुटुंबासोबत खासगी वाहनाने फिरायला आल्या होत्या. त्यांनी निरगुडपाड्याच्या बाजूने हरिहर किल्ल्यावर चढण्याची सुरुवात केली. किल्ल्यावर जात असताना एका ठिकाणावर फोटो काढत असताना रूपाली यांचा पाय घसरला आणि दगडावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त समजताच किल्ल्याच्या परिसरात असलेले वनरक्षक दिवे आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

हरिहर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो. चढाई करण्यास अतिशय कठीण मानला जाणाऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या असल्यामुळे थेट अंगावर येणाऱ्या असल्याने घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. किल्ला चढत वा उतरत असताना खोल दऱ्या पाहून डोळे गरगरून अपघात होण्याची दाट शक्यता असते.

------------------------------------------------------------

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

चढाईसाठी अतिशय कठीण असलेल्या हरिहर किल्ला पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक ठरला आहे; परंतु थेट कातळात कोरलेल्या पायऱ्या असल्यामुळे येथे चढाई केल्यानंतर अनेकांचे खाली पाहिल्यानंतर डोळे गरगरणे साहजिकच आहे. महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर मात्र पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

------------------------------------------------------------

जीवघेणे साहस टाळावे : प्रशासनाचे आवाहन

 

पर्यटकांसाठी आव्हान असलेल्या हरिहर किल्ल्याची भ्रमंती करताना पर्यटकांनी जीवघेणे साहस करू नये. हरिहर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अवघड असलेल्या किल्ल्यावर पर्यटक आपल्या कुटुंबासोबत दुर्गभटकंती करण्यासाठी येत असतात. अनेक जणांना अवघड वाटा व मार्ग माहीत नसताना किल्ला चढण्याचा प्रयत्न करतात. आकर्षक ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. परिणामी दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे निसर्गपर्यटन करणाऱ्यांनी साहस करणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

-----------------------------------------------------------------

२९ रुपाली चौधरी

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू