शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

हरिहर किल्ल्यावरून पडल्याने महिला पर्यटकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:04 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देपर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील रूपाली ज्ञानेश्वर चौधरी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली या आपल्या कुटुंबासोबत खासगी वाहनाने फिरायला आल्या होत्या. त्यांनी निरगुडपाड्याच्या बाजूने हरिहर किल्ल्यावर चढण्याची सुरुवात केली. किल्ल्यावर जात असताना एका ठिकाणावर फोटो काढत असताना रूपाली यांचा पाय घसरला आणि दगडावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे वृत्त समजताच किल्ल्याच्या परिसरात असलेले वनरक्षक दिवे आणि कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

हरिहर किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो. चढाई करण्यास अतिशय कठीण मानला जाणाऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या असल्यामुळे थेट अंगावर येणाऱ्या असल्याने घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. किल्ला चढत वा उतरत असताना खोल दऱ्या पाहून डोळे गरगरून अपघात होण्याची दाट शक्यता असते.

------------------------------------------------------------

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

चढाईसाठी अतिशय कठीण असलेल्या हरिहर किल्ला पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक ठरला आहे; परंतु थेट कातळात कोरलेल्या पायऱ्या असल्यामुळे येथे चढाई केल्यानंतर अनेकांचे खाली पाहिल्यानंतर डोळे गरगरणे साहजिकच आहे. महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर मात्र पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

------------------------------------------------------------

जीवघेणे साहस टाळावे : प्रशासनाचे आवाहन

 

पर्यटकांसाठी आव्हान असलेल्या हरिहर किल्ल्याची भ्रमंती करताना पर्यटकांनी जीवघेणे साहस करू नये. हरिहर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अवघड असलेल्या किल्ल्यावर पर्यटक आपल्या कुटुंबासोबत दुर्गभटकंती करण्यासाठी येत असतात. अनेक जणांना अवघड वाटा व मार्ग माहीत नसताना किल्ला चढण्याचा प्रयत्न करतात. आकर्षक ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. परिणामी दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे निसर्गपर्यटन करणाऱ्यांनी साहस करणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

-----------------------------------------------------------------

२९ रुपाली चौधरी

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू