शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:04 IST

दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं.

नाशिक : दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. एका क्षणात घडलेली घटना आणि घटनेनंतर एकेक मृतदेह स्मशानभूमीत येतांनाचे दृश्यपाहून त्या भयावह अपघाताचे भय मानातून जात नाही. अशा भावनाविवश प्रतिक्रिया आजही अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उमटत होत्या.मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात आगरटाकळीतील राहुलनगरमधील एकाच घराण्यातील सात जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर कुटुंबीय अजूनही सावरले नाही. मयतांना अग्निडाग दिल्यानंतर जणू काही गंभीर घडलेच नाही अशा चेहऱ्याने जखमींसमोर जावे लागले. रात्री आणि दुसºया दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जखमींच्या उपचारासाठी आणि पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयातून हलविण्याचे काम सुरू होते. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयातून काही जखमींना जिल्हा रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींना त्या भयावह घटनेतील वास्तव माहिती होऊ नये यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत.कांडेकर, डांगे, गवळी आणि लोंढे कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरून रविवारचा घातवार अजूनही जात नाही. घटनेतील तो आक्राळ चेहरा त्यांना अजूनही भयग्रस्त करून टाकतो. घटनेनंतरच्या रात्रीनंतर कुणीही शांत झोपू शकलेले नाही.रविवारचा काळा दिवस या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण टाकळीवासीयांना अस्वस्थ करणारा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून अपघाताची चर्चा थांबलेली नाही. अपघाताच्या घटनेनंतर सारेच दु:खात असले तरी एकमेकांना आधार देण्याचे काम प्रत्येकाला करावे लागत आहे. डोळ्यातील आश्रू आटले आहेत, हुंदक्यांच्या आवाजातील गहिवर दु:खाची गहरी जाणीव निर्माण करणारा आहे. घरातील प्रत्येक लहान-मोठ्यांच्या डोळ्यात या मृत्यू तांडवाचे भय अजूनही स्पष्टपणे जाणवते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात