शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:16 IST

शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिंडोरीची निवड : राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

नाशिक : शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टने यासाठी स्मार्टफोनसाठी अ‍ॅप विकसित केले असून, प्रायोगिक पातळीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे हा प्रयोग राबविण्यात येऊन त्यात मिळालेल्या यशस्वीतेच्या आधारे आता सहा तालुक्यांत त्याची चाचपणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात दिंडोरीसह कामठी (नागपूर), अचलपूर (अमरावती), फुलंब्री (औरंगाबाद), बारामती (पुणे) व वाडा (पालघर) या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने शेतकरी प्रत्येक हंगामात घेत असलेल्या पिकाची सातबारा उताºयावर नोंद घेण्याची जबाबदारी तलाठ्यांवर निश्चित करण्यात आली असली तरी, तलाठ्यांकडील अन्य कामांचा व्याप पाहता त्यांच्याकडून शेतकºयांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे कार्यालयात बसूनच पीक पेरणीची नोंद घेतली जात होती. परंतु त्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीसह अनेक त्रुटी निर्माण होत असे. बहुतांशी वेळा शेतकरी शेतात पीक पेरत नसतानाही त्याची नोंद तलाठ्याकडे जाऊन करून घेत, नंतर मात्र नैसर्गिक आपत्ती अथवा पीक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाल्यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याबरोबर शेतात पेरलेल्या पिकावरच कृषिकर्ज दिले जात असल्याने त्यातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे.तलाठ्याकडे नोंद करणे आवश्यकशेतकºयांनी या अ‍ॅपचा वापर करण्यापूर्वी संबंधित गाव तलाठ्याकडे स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करणे आवश्यक असून, अ‍ॅपमध्ये सातबारा उताºयातील सारे रकाने असल्यामुळे गटनंबर, सर्व्हेनंबर, क्षेत्र, पिकाचा प्रकार आदी बाबींची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या शेतकºयाकडे स्मार्ट भ्रमणध्वनी नसेल त्याचे साध्या फोनने लघुसंदेश (एसएमएस)माध्यमातूनदेखील पीक पेरणीची माहिती पाठविता येणार आहे. मात्र ज्याच्याकडे फोन नाहीच त्यांनी त्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन त्याच्या आधारे नोंद करण्याची सोय आहे.असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शेतकºयांनीच स्वत:च पीक पेरणीची नोंद करावी व दर पंधरवडा, महिना अखेर पिकाचे शेतातील छायाचित्र अ‍ॅपवर लोड केल्यास या संदर्भातील सर्व वादविवादांना पूर्णविराम मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक