शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:16 IST

शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिंडोरीची निवड : राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

नाशिक : शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टने यासाठी स्मार्टफोनसाठी अ‍ॅप विकसित केले असून, प्रायोगिक पातळीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे हा प्रयोग राबविण्यात येऊन त्यात मिळालेल्या यशस्वीतेच्या आधारे आता सहा तालुक्यांत त्याची चाचपणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात दिंडोरीसह कामठी (नागपूर), अचलपूर (अमरावती), फुलंब्री (औरंगाबाद), बारामती (पुणे) व वाडा (पालघर) या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने शेतकरी प्रत्येक हंगामात घेत असलेल्या पिकाची सातबारा उताºयावर नोंद घेण्याची जबाबदारी तलाठ्यांवर निश्चित करण्यात आली असली तरी, तलाठ्यांकडील अन्य कामांचा व्याप पाहता त्यांच्याकडून शेतकºयांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे कार्यालयात बसूनच पीक पेरणीची नोंद घेतली जात होती. परंतु त्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीसह अनेक त्रुटी निर्माण होत असे. बहुतांशी वेळा शेतकरी शेतात पीक पेरत नसतानाही त्याची नोंद तलाठ्याकडे जाऊन करून घेत, नंतर मात्र नैसर्गिक आपत्ती अथवा पीक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाल्यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याबरोबर शेतात पेरलेल्या पिकावरच कृषिकर्ज दिले जात असल्याने त्यातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे.तलाठ्याकडे नोंद करणे आवश्यकशेतकºयांनी या अ‍ॅपचा वापर करण्यापूर्वी संबंधित गाव तलाठ्याकडे स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करणे आवश्यक असून, अ‍ॅपमध्ये सातबारा उताºयातील सारे रकाने असल्यामुळे गटनंबर, सर्व्हेनंबर, क्षेत्र, पिकाचा प्रकार आदी बाबींची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या शेतकºयाकडे स्मार्ट भ्रमणध्वनी नसेल त्याचे साध्या फोनने लघुसंदेश (एसएमएस)माध्यमातूनदेखील पीक पेरणीची माहिती पाठविता येणार आहे. मात्र ज्याच्याकडे फोन नाहीच त्यांनी त्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन त्याच्या आधारे नोंद करण्याची सोय आहे.असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शेतकºयांनीच स्वत:च पीक पेरणीची नोंद करावी व दर पंधरवडा, महिना अखेर पिकाचे शेतातील छायाचित्र अ‍ॅपवर लोड केल्यास या संदर्भातील सर्व वादविवादांना पूर्णविराम मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक