शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:16 IST

शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिंडोरीची निवड : राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

नाशिक : शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टने यासाठी स्मार्टफोनसाठी अ‍ॅप विकसित केले असून, प्रायोगिक पातळीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे हा प्रयोग राबविण्यात येऊन त्यात मिळालेल्या यशस्वीतेच्या आधारे आता सहा तालुक्यांत त्याची चाचपणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात दिंडोरीसह कामठी (नागपूर), अचलपूर (अमरावती), फुलंब्री (औरंगाबाद), बारामती (पुणे) व वाडा (पालघर) या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने शेतकरी प्रत्येक हंगामात घेत असलेल्या पिकाची सातबारा उताºयावर नोंद घेण्याची जबाबदारी तलाठ्यांवर निश्चित करण्यात आली असली तरी, तलाठ्यांकडील अन्य कामांचा व्याप पाहता त्यांच्याकडून शेतकºयांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे कार्यालयात बसूनच पीक पेरणीची नोंद घेतली जात होती. परंतु त्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीसह अनेक त्रुटी निर्माण होत असे. बहुतांशी वेळा शेतकरी शेतात पीक पेरत नसतानाही त्याची नोंद तलाठ्याकडे जाऊन करून घेत, नंतर मात्र नैसर्गिक आपत्ती अथवा पीक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाल्यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याबरोबर शेतात पेरलेल्या पिकावरच कृषिकर्ज दिले जात असल्याने त्यातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे.तलाठ्याकडे नोंद करणे आवश्यकशेतकºयांनी या अ‍ॅपचा वापर करण्यापूर्वी संबंधित गाव तलाठ्याकडे स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करणे आवश्यक असून, अ‍ॅपमध्ये सातबारा उताºयातील सारे रकाने असल्यामुळे गटनंबर, सर्व्हेनंबर, क्षेत्र, पिकाचा प्रकार आदी बाबींची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या शेतकºयाकडे स्मार्ट भ्रमणध्वनी नसेल त्याचे साध्या फोनने लघुसंदेश (एसएमएस)माध्यमातूनदेखील पीक पेरणीची माहिती पाठविता येणार आहे. मात्र ज्याच्याकडे फोन नाहीच त्यांनी त्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन त्याच्या आधारे नोंद करण्याची सोय आहे.असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शेतकºयांनीच स्वत:च पीक पेरणीची नोंद करावी व दर पंधरवडा, महिना अखेर पिकाचे शेतातील छायाचित्र अ‍ॅपवर लोड केल्यास या संदर्भातील सर्व वादविवादांना पूर्णविराम मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक