शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:49 IST

रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभुजबळ : जिल्हा प्रशासनाला इशारा; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

नाशिक : रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्णात दुष्काळाची भीषण परिस्थितीत असून, जिल्ह्णातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. त्यामुळे दि.१५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्याची मी यापूर्वी मागणी केलेली होती आणि १५ नोव्हेंबरपर्यंत पाणी देऊ, असे मला आश्वासन देण्यात आलेले होते.कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे आवर्तनांबाबत संभ्रम निर्माण होऊन शेतकºयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मला यावे लागल्याचे भुजबळांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. पाणीवापर संस्थांना त्यांचा पूर्ण कोटा द्या आणि आवर्तनादरम्यान शेतकºयांना त्रास देऊ नका, असेही भुजबळांनी सांगितले. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्णातील येवला व लासलगाव, ओझर आणि पिंपळगाव या महसूल मंडळामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना या मंडळाचा समावेश न झाल्याने या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, अरुण थोरात, गणपत कांदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधीक्षक अभियंता राजेश मोरे व जलसंपदा विभागाचे उपस्थित होते.आवर्तनाबाबत नियोजन नसल्याने पाण्याअभावी शेतकºयांची पिके जळायला लागली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्षे, डाळींब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने येवला व निफाड तालुक्यातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकºयांची हानी होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीChhagan Bhujbalछगन भुजबळ