शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पाणी असूनही न सोडल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:49 IST

रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देभुजबळ : जिल्हा प्रशासनाला इशारा; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

नाशिक : रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून सोमवार, दि.१९ नोव्हेंबरचा पाणी सोडण्याचा मुहूर्त टळला तर शेतकरी कायदा हातात घेतील, अशा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिला. पालखेड लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील रब्बी पिकांसाठी पालखेड डावा कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्णात दुष्काळाची भीषण परिस्थितीत असून, जिल्ह्णातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. त्यामुळे दि.१५ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्याची मी यापूर्वी मागणी केलेली होती आणि १५ नोव्हेंबरपर्यंत पाणी देऊ, असे मला आश्वासन देण्यात आलेले होते.कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे आवर्तनांबाबत संभ्रम निर्माण होऊन शेतकºयांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मला यावे लागल्याचे भुजबळांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. पाणीवापर संस्थांना त्यांचा पूर्ण कोटा द्या आणि आवर्तनादरम्यान शेतकºयांना त्रास देऊ नका, असेही भुजबळांनी सांगितले. यावेळी छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्णातील येवला व लासलगाव, ओझर आणि पिंपळगाव या महसूल मंडळामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना या मंडळाचा समावेश न झाल्याने या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यासाठी शासनाला अहवाल पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, अरुण थोरात, गणपत कांदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अधीक्षक अभियंता राजेश मोरे व जलसंपदा विभागाचे उपस्थित होते.आवर्तनाबाबत नियोजन नसल्याने पाण्याअभावी शेतकºयांची पिके जळायला लागली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकºयांनी ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्षे, डाळींब यांसह इतर रब्बीची पिके घेतलेली आहेत. त्याचबरोबर प्रामुख्याने येवला व निफाड तालुक्यातील शेतकºयांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पीक असल्याने पाण्याअभावी शेतकºयांची हानी होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीChhagan Bhujbalछगन भुजबळ