शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

सत्ता आल्यास शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

By संजय पाठक | Updated: March 14, 2024 12:43 IST

देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले.

नाशिक-  देशामध्ये शेतकऱ्यांची आस्था नसलेले सरकार सत्तेवर आहे. यामुळे शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे कर लागू करण्यात आले आहेत. देशात परिवर्तन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नाशिकमध्ये दिले.नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे  राहुल गांधी यांची एकात्मता यात्रा पोहोचली त्यांच्या यात्रेचे चांदवड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर चांदवड येथील बाजार समितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी  केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होतेदेशातील शेतकरी चहू बाजूनी समस्यांनी घेरला गेला आहे त्यामुळे त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यास सर्वप्रथम कर्जमाफी त्यांना देण्यात येईल, मात्र केवळ कर्जमाफी घेऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना अन्य उपाय देखील करावे लागतील.

पीक विमा देणाऱ्या कंपन्या या शेतकऱ्यांसाठी असून त्यांच्या भरपाईच्या निकषांचे फेर नियोजन करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना संरक्षण कसे मिळतील याबाबत प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांना जीएसटी लागू करण्यात आला असून उत्पादनांना त्यांना टॅक्स भरावा लागतो हा करही काढून घेण्यात येईल आणि शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना किमान हमीभाव दिला जाईल असेही राहुल गांधी म्हणाले देशातील जवान आणि किसान या दोघांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली जाईल असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNashikनाशिकFarmerशेतकरीSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत