शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकरी आंदोलकांची वाहने पोलिसांनी नाशिकच्या वेशीवर रोखली, सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 19:39 IST

फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे. या सरकारने केवळ विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप अजित नवले यांनी केला.

नाशिक  -  सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच नाशिकचे वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यात आलेले आहे.   अहमनगर वरून येणाऱ्या शेतकऱ्यांना सिन्नर परिसरात रोखण्यात आले आहे.  तसेच पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण शेतकऱ्यांना म्हसरूळ येथे रोखण्यात आले आहे, असा आरोप किसान सभेचे अजित नवले यांनी केलेला आहे.  फडणवीस सरकार मायबाप शेतकऱ्याला वेठीस धरत असून, त्यांच्या संयमाचा अंत बघितला जात आहे.  या सरकारने केवळ विश्वासघात केलेला आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

 जेव्हा शेतकरी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात जमले आणि ताकद दिसली तेव्हा पालक मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चेसाठी या असे सांगितले.  पूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क करत होतो. तेव्हा ते वेळ देत नव्हते, अशी टीकाही नवले यांनी केली आहे. एक-दीड तास मागेपुढे जरी झाले तरी लाल वादळ थांबणार नाही. विधानसभेला लाल वादळ घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. गोदाकाठच्या पवित्र भूमीतून हे वादळ अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, असे आंदोलन नेतृत्व करणारे आमदार जे. पी. गावित, अजित नवले यांनी स्पष्ट केले. 

बुधवारी विधानसभेला घेरावकिसान सभेचा लॉँग मार्च येत्या बुधवारी (दि.२७) मुंबईत धडकणार आहे. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी, आदिवासी क ष्टकरी वर्ग सहभागी होणार आहे. शेतक-यांसह आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा लॉँग मार्च काढला जात आहे. बुधवारी मोर्चेकरी विधानसभेला घेराव घालणार आहे. चोख बंदोबस्त असा...लॉँगमार्चसाठी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दोन सहायक आयुक्तांसह पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, १०० महिला-पुरु ष पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकडीसह शीघ्रकृती दलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे. तसेच शहर पोलीसांच्या दिमतीला नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका-यांसह दीड हजार पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक