शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सोलर ड्रायरच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी १० टन कांद्यावर केली प्रक्रीया; सह्याद्री फार्म्स चा प्रकल्प

By संजय दुनबळे | Updated: July 18, 2023 20:24 IST

या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ५ टन बेदाणा, २ टन टोमॅटो व १० टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरित्या प्रक्रिया केली आहे.

नाशिक : शेतीमध्ये फळे आणि भाजीपाला उत्पादनात भावातील चढ उतार व निसर्गाच्या असमतोलामुळे होणारे पिकांचे नुकसान याचा शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आला आहे. ही परिस्थिती पाहता काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मुल्यवर्धन या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे . हा विचार करता सोलर ड्रायर सारखा पर्याय आवश्यक ठरतो. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ५ टन बेदाणा, २ टन टोमॅटो व १० टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरित्या प्रक्रिया केली आहे.

सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प मागील वर्षी हाती घेण्यात आला. यामध्ये ५०० किलो क्षमतेचे २० सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. यासाठी सस्टेन प्लस यांच्याकडून प्रति ड्रायर ६५ टक्के आर्थिक साह्य व उर्वरित ३५ टक्के आर्थिक भार शेतकऱ्यांनी उचलला. या माध्यमातून एकूण २० सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना २० लाखाचे आर्थिक साह्य मिळाले. यासर्व ड्रायरची उभारणी इंदोरस्थित रहेजा सोलार या संस्थेमार्फत करण्यात आली. सोलर ड्रायर उभारणीनंतर शेतकऱ्यांना सह्याद्री फार्म्स व रहेजा सोलर यांच्या मार्फत उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले.

मागील वर्षभरात या शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकातून बेदाणा निर्मिती, टोमॅटोपासून सुकलेले काप तसेच मागील मार्च महिन्यापासून कांद्यापासून सुकविलेल्या कांद्याची निर्मिती करीत आहे. यामध्ये टोमॅटो व कांदा पिकांमध्ये घसरलेल्या भावाच्या परिस्थितीत सोलर ड्रायर च्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा वेगळा पर्याय निर्माण होऊ शकला. प्रक्रिया केलेल्या मालाची खरेदी रहेजा सोलार्स मार्फत केली जात आहे. या प्रयोगाची प्रायोगिक तत्वावर झालेली उभारणी व त्याला मिळालेले यश पाहता नवीन शेतकरी या ड्रायर उभारणीसाठी आग्रही आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत तसेच सस्टेन प्लस यांच्यामार्फत नवीन शेतकऱ्यांना सोलर ड्रायर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

‘‘द्राक्ष काढणीनंतर उरलेल्या मण्यांना प्रक्रिया केल्यामुळे अधिकचा भाव मिळू शकला. पुर्वी आम्ही फक्त मणी व्यापाऱ्यांना विक्री करायचो. परंतू आता सोलार ड्रायर मुळे चांगल्या दर्जाची बेदाणा निर्मिती करुन त्यातून मुल्यवर्धन झाले व त्यामुळे नेहमीपेक्षा चांगला दरही मिळाला. तसेच उत्पन्नाचा एक वेगळा मार्ग तयार झाला. - –महेंद्र सुरवाडे, खतवड, ता. दिंडोरी, जि. नाशिक 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाNashikनाशिक