शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती ; महाबीज, एनएससी पुरवठा, विक्रीत पिछाडीवर

By नामदेव भोर | Updated: June 26, 2020 17:51 IST

महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची खरेदी महाबीज, एनएससीकडून तुलनेत कमी बियाण्यांचा पुरवठा

नामदेव भोर/नाशिक: जिल्ह्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची झाली असून, महाबीज व एनएससीच्या बियाण्यांपेक्षा शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांच्या बियाण्यांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत असताना महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळ शेतकऱ्यांच्या आवश्यक तेनुसार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.  नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला असून, त्यापैकी ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. परंतु यात ५८ हजार २२४ क्विंटल एवढा सर्वाधिक वाटा खासगी कंपन्यांचा आहे, तर महाबिज केवळ नऊ हजार १८१ व एनएससीच्या तीन हजार ७१० क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. तुलनेत खासगी कंपन्यांनी बाजारात तब्बल ८१ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला होता, तर महाबिजने ९ हजार ६९० व एनएससीने ५ हजार ५०० असा एकूण १५ हजार १९० क्विंटल बियाणे पुरवठा केला होेता. म्हणजे खासगी कंपन्यांनी महाबीज अणि एनएससीपेक्षा सुमारे ५.३९ पटीने अधिक पुरवठा करून जवळपास ४.५१ पटीने अधिक विक्री केली आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, उडीद, भुईमूग व कापूस यासारखी खरीप पिके घेतली जातात. त्यासाठी जिल्ह्यात महाबीजचे ९ हजार ६९० क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) ५ हजार ५ क्विंटल व खासगी कंपन्यांकडून ८१ हजार ९१२  क्विंटल असा एकूण ९७ हजार १०२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ३१ हजार १५२ क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले आहेत. परंतु, या योजनेचा लाभ केवळ १९४८ गावांमधील ७ हजार ४९५ गटांना मिळाला असून, गटापासून दूर राहिलेले एकल शेतकरी मात्र थेट बांधावर खते आणि बियाणे योजनेपासून वंचित राहिले आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकFarmerशेतकरी