शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:33 IST

शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजविपणन आणि व्यवस्थापन कौशल्यही मिळविणे आवश्यक पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.अनंत कान्हेरे मैदानावर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.25) राज्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम जगताप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले,शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक शेतकर्यांनी फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती क्षेत्रत उल्लेखणीय कामिगरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन वेगवेगळ्य़ा उपकरणांची व कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दरम्यान,जिल्हा कृषी प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतक:यांनी भेट दिली असून सुमारे दीड कोटी रु पयांच्या उत्पादनांची विक्र ी पाच दिवसात झाली. त्याचप्रमाणो 24 शेतकऱ्यांचे वेगवेगळ्य़ा खरेदीदारांसोबत करारही झाल्याची माहिकी आत्माचे प्रकल्प संचालक .अशोक कांबळे यांनी दिली आहे.शेंद्रीय शेतीद्वारे उत्पादनात वाढ शक्यशेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

डाळिंब, द्राक्ष पिकांविषयी मार्गदर्शनपाच दिवस चाललेल्या कृषि महोत्सवात विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रत ह्यडाळींब व द्राक्षेह्ण या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली जिल्ह्यातील प्रा.वसंत माळी यांनी शेतक:यांना डाळिंब व द्राक्ष पिकांविषयी माहिती दिली.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी