शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:33 IST

शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजविपणन आणि व्यवस्थापन कौशल्यही मिळविणे आवश्यक पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.अनंत कान्हेरे मैदानावर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.25) राज्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम जगताप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले,शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक शेतकर्यांनी फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती क्षेत्रत उल्लेखणीय कामिगरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन वेगवेगळ्य़ा उपकरणांची व कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दरम्यान,जिल्हा कृषी प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतक:यांनी भेट दिली असून सुमारे दीड कोटी रु पयांच्या उत्पादनांची विक्र ी पाच दिवसात झाली. त्याचप्रमाणो 24 शेतकऱ्यांचे वेगवेगळ्य़ा खरेदीदारांसोबत करारही झाल्याची माहिकी आत्माचे प्रकल्प संचालक .अशोक कांबळे यांनी दिली आहे.शेंद्रीय शेतीद्वारे उत्पादनात वाढ शक्यशेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

डाळिंब, द्राक्ष पिकांविषयी मार्गदर्शनपाच दिवस चाललेल्या कृषि महोत्सवात विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रत ह्यडाळींब व द्राक्षेह्ण या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली जिल्ह्यातील प्रा.वसंत माळी यांनी शेतक:यांना डाळिंब व द्राक्ष पिकांविषयी माहिती दिली.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी