शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 18:33 IST

शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजविपणन आणि व्यवस्थापन कौशल्यही मिळविणे आवश्यक पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप

नाशिक : शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात  विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.अनंत कान्हेरे मैदानावर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.25) राज्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम जगताप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले,शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक शेतकर्यांनी फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती क्षेत्रत उल्लेखणीय कामिगरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन वेगवेगळ्य़ा उपकरणांची व कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दरम्यान,जिल्हा कृषी प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतक:यांनी भेट दिली असून सुमारे दीड कोटी रु पयांच्या उत्पादनांची विक्र ी पाच दिवसात झाली. त्याचप्रमाणो 24 शेतकऱ्यांचे वेगवेगळ्य़ा खरेदीदारांसोबत करारही झाल्याची माहिकी आत्माचे प्रकल्प संचालक .अशोक कांबळे यांनी दिली आहे.शेंद्रीय शेतीद्वारे उत्पादनात वाढ शक्यशेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

डाळिंब, द्राक्ष पिकांविषयी मार्गदर्शनपाच दिवस चाललेल्या कृषि महोत्सवात विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रत ह्यडाळींब व द्राक्षेह्ण या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली जिल्ह्यातील प्रा.वसंत माळी यांनी शेतक:यांना डाळिंब व द्राक्ष पिकांविषयी माहिती दिली.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनFarmerशेतकरी