शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान निधी खात्यात जमा अन् परतही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सिन्नर येथील एका शेतकऱ्याच्या नावावर दुपारी दोन हजार रुपये जमा झाले आणि अवघ्या काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला.केंद्र सरकारने अंदाजपत्रकात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घोषित केली होती आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने घाईघाईने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नाशिक विभागात दहा लाख तर जिल्ह्यात तीन लाख शेतकरी लाभेच्छुक असतील, असे शासकीय सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील विभाग स्तरावर कार्यक्रम झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात या योजनेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते करण्यत आला. त्याचवेळी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रविवारीच (दि. २४) दोन हजार रुपयांचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्णातील अशोक लहागमे यांना दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना काहीसे समाधान वाटले, परंतु ते औट घटकेचे ठरले. दुपारी त्यांच्या खात्यातून सदर रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. परंतु रविवारची सुट्टी असल्याने हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी बॅँकेत जाण्याची सोय नव्हती. सोमवारी (दि. २५) स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सिन्नर येथील शाखेशी संपर्क साधला. त्यावेळी पासबुकमध्येही पैसे जमा झाल्याची आणि काढून घेतल्याची नोंद झाली. परंतु याबाबत काही माहिती नाही. मुंबईत हेड आॅफिसला मेल करा, असे सांगून या शाखेच्या अधिकाºयांनी हात वर केले. त्यामुळे सन्मानधन योजना केवळ शुभारंभापुरतीच होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिकमध्ये अनेक शेतकºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी अल्प शिक्षित किंवा शिकलेले नसल्याने बॅँकेच्या खात्यात मेल करून काय माहिती घेणार, असा प्रश्न लहामगे यांनी उपस्थित केला आहे.शेतकºयांचा हा अपमानकिसान सन्मान अंतर्गत शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग केलेले पैसे परत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर आल्या. ही बाब अत्यंत खेदजनक व शेतकºयांचा अपमान करणारी आहे. साडेचार वर्षांपूर्वी नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सत्ताधाºयांकडून चालविलेल्या घिसाडघाईमुळेच असा गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा तर मिळालाच नाही; मात्र वाट्याला मनस्तापच आला.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा.. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार