शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

किसान सन्मान निधी खात्यात जमा अन् परतही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. सिन्नर येथील एका शेतकऱ्याच्या नावावर दुपारी दोन हजार रुपये जमा झाले आणि अवघ्या काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा प्रकार घडला.केंद्र सरकारने अंदाजपत्रकात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घोषित केली होती आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने घाईघाईने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नाशिक विभागात दहा लाख तर जिल्ह्यात तीन लाख शेतकरी लाभेच्छुक असतील, असे शासकीय सूत्रांनी सांगितले. रविवारी (दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर महाराष्ट्रातदेखील विभाग स्तरावर कार्यक्रम झाले. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठात या योजनेचा शुभारंभ विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते करण्यत आला. त्याचवेळी जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रविवारीच (दि. २४) दोन हजार रुपयांचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्णातील अशोक लहागमे यांना दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना काहीसे समाधान वाटले, परंतु ते औट घटकेचे ठरले. दुपारी त्यांच्या खात्यातून सदर रक्कम परत काढून घेण्यात आल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. परंतु रविवारची सुट्टी असल्याने हा काय प्रकार आहे हे विचारण्यासाठी बॅँकेत जाण्याची सोय नव्हती. सोमवारी (दि. २५) स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सिन्नर येथील शाखेशी संपर्क साधला. त्यावेळी पासबुकमध्येही पैसे जमा झाल्याची आणि काढून घेतल्याची नोंद झाली. परंतु याबाबत काही माहिती नाही. मुंबईत हेड आॅफिसला मेल करा, असे सांगून या शाखेच्या अधिकाºयांनी हात वर केले. त्यामुळे सन्मानधन योजना केवळ शुभारंभापुरतीच होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नाशिकमध्ये अनेक शेतकºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी अल्प शिक्षित किंवा शिकलेले नसल्याने बॅँकेच्या खात्यात मेल करून काय माहिती घेणार, असा प्रश्न लहामगे यांनी उपस्थित केला आहे.शेतकºयांचा हा अपमानकिसान सन्मान अंतर्गत शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग केलेले पैसे परत घेतले जात असल्याच्या बातम्या कानावर आल्या. ही बाब अत्यंत खेदजनक व शेतकºयांचा अपमान करणारी आहे. साडेचार वर्षांपूर्वी नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सत्ताधाºयांकडून चालविलेल्या घिसाडघाईमुळेच असा गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा तर मिळालाच नाही; मात्र वाट्याला मनस्तापच आला.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा.. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार