शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेपोटी शेतकरी घेत नाही तागाचे पीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:06 IST

नाशिक तालुक्यातील पिढ्यान पिढ्यांनी आजवर पाळलेले हे निर्बंध पाहून कोणी याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणूनही पाहत असले तरी, वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोटमगावचे ग्रामदैवत मांगीर बाबा (मांग वीर बाबा) असून, या दैवताला ताग वर्ज्य आहे.

ठळक मुद्देदुर्घटनेची भीती : कोटमगावकरांची मांगीरबाबावर श्रद्धा मांगीरबाबा नवनाथांपैकी एक असल्याची आख्यायिका आहे.

नाशिक : नैसर्गिक खत व दोरखंड तयार करण्यासाठी शेतीला उपयुक्त ठरणाऱ्या ताग पिकाचे फायदे शेतकरी जाणून असतानाही नाशिक तालुक्यातील कोटमगाव हे एकमेव गाव पिढ्यान् पिढ्यांपासून तागाची ना शेती करत, ना तागाच्या शेतात कामाला जात. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या खेळात संपूर्ण गाव तागाच्या शेतीपासून आजवर वंचित राहिले असून, ज्याने कोणी तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर अरिष्ट कोसळल्याच्या अख्यायिकेमुळे आजवर तसे धाडस कोणी केले नाही. त्यामागचे कारण म्हणजे गावाच्या ग्रामदैवताला असलेले ताग पिकाचे वर्ज्य.नाशिक तालुक्यातील पिढ्यान पिढ्यांनी आजवर पाळलेले हे निर्बंध पाहून कोणी याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धा म्हणूनही पाहत असले तरी, वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोटमगावचे ग्रामदैवत मांगीर बाबा (मांग वीर बाबा) असून, या दैवताला ताग वर्ज्य आहे. त्यामुळे येथील शिवारात कोणीही तागाची लागवड केली तर त्या शेतकºयाच्या कुटुंबावर काहीतरी अरिष्ट कोसळते असा समज आहे. मात्र कोटमगावच्या शिवारालगत असलेले सामनगाव, जाखोरी, हिंगणवेढे, एकलहरे येथील शेतकरी वर्षानुवर्षे आपल्या शेतात तागाचे पीक घेत असून, त्यातून चांगले उत्पन्नही काढत आहेत. त्यांना मात्र कोणत्याही दुर्घटनेला सामोरे जावे लागत नसल्याचे सांगितले जाते. तथापि, ज्या गावांमध्ये तागाचे पीक घेतले जाते, त्या गावांमध्ये पेरलेल्या तागाच्या शेतीत कामासाठी कोटमगावचे शेतकरी काही केल्या जात नाहीत हीदेखील वस्तुस्थिती आहे.तागाचा उपयोग शेतीला नैसर्गिक खत म्हणून करतात, तर मोठ्या तागाला पाण्यात कुजवून त्यापासून दोरखंड तयार केला जातो. शेतीला दुहेरी उपयोगी पडणारे हे पीक जरी असले तरी, कोटमगावचे ग्रामदैवत मांगीरबाबाला ताग वर्ज्य असल्याने कोणीच तागाचे पीक घेत नाही. मांगीरबाबा नवनाथांपैकी एक असल्याची आख्यायिका आहे. गावातील सर्वांत वयोवृद्ध शेतक-याशी प्रस्तृत प्रतिनिधीने संपर्क साधल्यावर त्यांनी पिढ्यान पिढ्या ही प्रथा चालत आल्याचे सांगितले. तागामुळे मांगीरबाबाची अवकृपा होते व अरिष्ट कोसळते अशी भीती गावकºयांमध्ये असल्यामुळे येथील शेतकरी तागाचे पीक घेण्याचे धाडस करत नाहीत. मांगीरबाबमुळे आमच्या गावात शांतता नांदते. त्यासाठी चैत्र महिन्यात मांगीरबाबाची मोठी यात्रा भरते. त्यासाठी कै. शंकर खंडू घुगे यांच्या जागेवर मंदिर बांधलेले आहे. यात्रेच्या काळात संपूर्ण शेत मोकळे ठेवले जाते.प्रतिक्रिया===कोटमगावला ताग पेरत नाहीत हे शंभर टक्के खरे आहे. आमच्या मागच्या पिढ्यांपासून ही प्रथा चालत आली आहे. ग्रामदैवत मांगीरबाबा यांचे जागृत देवस्थान असून, गावात जशी इतर चार-पाच मंदिरे आहेत तसे मांगीरबाबाचेही मंदिर आहे. बाबाला ताग धार्जिना नाही म्हणून आम्ही ताग करीत नाही. आमच्या गावातील एक ट्रॅक्टरवाला पैशाच्या हव्याशापोटी शेजारच्या गावातील तागाच्या शेतात काम करण्यासाठी गेला. त्याचा ट्रॅक्टरही बिघडला आणि त्याच्या सगळ्या अंगाला खाज सुटली अशी अनेक उदाहरणे आमच्या डोळ्यासमोर घडली आहेत.-महादेव पुंजाजी घुगे ऊर्फ चेअरमनबाबा

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNashikनाशिक