शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 10:22 PM

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही.

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही. शेतकºयांचे अतोनात हाल झाले. अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचे कसे, याची भ्रांत भेडसावत असताना हिंगणवेढे येथील २० जणांचे एकत्र कुटुंब असलेल्या धात्रक परिवाराने या संकटावर मात करीत यातून मार्ग काढला.हिंगणवेढे येथील शेतकरी निवृत्ती धात्रक यांचे साहेबराव, बाळू, वसंत व संपत आणि त्यांची बायका, मुले मिळून २० जणांचे कुटुंब एकत्रितपणे मळ्यात राहातात. कोरोनाच्या भयंकर संकटाशी सामना करताना त्यांनी ९१ वर्षीय वडिलांच्या सल्ल्याने शेतकामांचे, भाजीपाला विक्रीचे व कुटुंबाच्या खर्चाचे योग्य नियोजन केले. कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क वापरून, फिजिकल डिस्टन्स ठेवून काम करण्याच्या सूचना चिरंजीव साहेबराव यांनी दिल्या.त्यांनी टमाटे, कोबी, कांदे यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र ऐन पिके काढणीच्या वेळेस लॉकडाउन लागू झाला. दरम्यान साहेबराव यांना खासगी कंपन्यांचा आधार मिळाला. शेतमाल चितेगाव फाट्यावरील कंपनीच्या मॉलपर्यंत पोहोचविला. मात्र दर कमी मिळाला. निराश न होता धात्रक कुटुंबाने जिद्दीने कोरोनाचा मुकाबला करत एक आदर्श घडवून दिला आहे. आपल्या शेतमाल विकण्याचे कसब दाखविले.कोरोनाच्या ऐन संकट काळात शेतात टमाटे, कोबी, कांदे एकाच वेळी काढणीस आले. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच होत असल्याने घरातील सर्वच लहान-मोठे कामाला लागले.---------------------------शेतकरी कुटुंबातील सर्वच लागले कामाला४ संचारबंदी, मार्केटबंदी, पोलिसांचा खडा पहारा, कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या अशा बिकट परिस्थितीला सामोरे जात शेतकºयांनी आपल्या कुटुंबाची मदत घेतली. धात्रक परिवारानेही न डगमगता भाजीपाला खासगी कंपनीला पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य कामाला लागले.---------------------कोणतीही परिस्थिती जास्त काळ थांबून राहत नाही. प्लेगची साथ आली तेव्हा लस नव्हती. आता कोरोनाची साथ आली, त्यावरही लस शोधण्याचे काम सुरू आहे. हेही दिवस निघून जातील. परिस्थितीचा धिराने व संयमाने सामना करणे एवढेच आपल्या हातात असते.- निवृत्ती धात्रक, शेतकरी हिंगणवेढे--------------------------सुरु वातीला टमाट्याला दहा रु पये प्रतिकिलो, तर कोबीला पाच रु पये प्रतिनग दर मिळाला. कंपनीचे टार्गेट पूर्ण झाल्यावर माल घेणे बंद केले. मार्केट सुरू झाल्यावर शिल्लक माल नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा येथे विकून मिळेल तो दर पदरात पाडून घेतला. टमाटे, कोबी संपल्यानंतर आम्ही कांदा विक्र ीचे नियोजन केले.- साहेबराव धात्रक, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक