शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

द्राक्ष तपासणीच्या नावाखाली उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 15:10 IST

द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांनी लक्ष वेधले : कृषीमंंत्र्यांना लिहीले पत्र तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नाही

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतक-यांच्या द्राक्ष रासायनिक अवशेष तपासणी अहवालाची माहिती शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेल वर मिळत नसल्याने शेतक-यांची फसवणूक होत असून, निर्यातदारांकडून काही विशिष्ट प्रयोगशाळेतूनच द्राक्षाची चाचणी करण्याचा आग्रह धरतात व या प्रयोगशाळा परस्पर निर्यातदारांना त्याचा अहवाल पाठवित असल्याने द्राक्ष उत्पादक शेतक-यांची मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतक-यांना एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, ई-मेलवर तपासणी अहवाल मिळावे अशा मागणीचे पत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांना दिले आहे.छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, द्राक्ष उत्पादक शेतक-यांना निर्यातदारांकडून विशिष्ट प्रयोगशाळेची अट घातली जात आहे. तसेच प्रयोगशाळांकडून शेतक-यांना रासायनिक अवशेष तपासणी अहवाल मिळत नसल्याचीही शेतक-यांची तक्रार आहे. रासायनिक अंशाचे प्रमाण अधिक असल्याची बतावणी करत व्यापारी कमी भावाने द्राक्ष खरेदी करत आहेत. परिणामी व्यापा-यांकडून फसवणूक होत असल्याची शेतक-यांच्या तक्रारी आहेत. नाशिक जिल्ह्यात तीस हजारांहून अधिक द्राक्ष निर्यातदार शेतकरी असून या शेतक-यांची द्राक्षे परदेशात जात असतात. युरोपमध्ये द्राक्षाला अधिक भाव मिळत असल्याने आपली द्राक्षे युरोपमध्येच जावीत अशी प्रत्येक शेतक-याची भावना आहे. त्यासाठी द्राक्षाचा अंशदर कमीत कमी असणे गरजेचे असते, मात्र प्रयोगशाळांकडून तपासणीचा अहवाल शेतक-यांना न पाठवता निर्यातदार व्यापा-यांना पाठवला जात असल्यामुळे व्यापारी सांगतील तसा अंशदर शेतक-यांना मान्य करावा लागून याचाच फायदा व्यापारी उठवत आहेत.द्राक्षांमध्ये अंशदर अधिक असून तुमची द्राक्षे युरोपला जाऊ शकत नसल्याचे सांगून युरोपऐवजी इतर देशात तुमची द्राक्षे पाठवावी लागतील अशी बतावणी करत व्यापारी द्राक्षांचे भाव पाडत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे रासायनिक अवशेष तपासणी अहवाल व्यापा-यांसोबतच शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर, व्हॉटसअ‍ॅपवर वा ई-मेलवर मिळावे अशी शेतक-यांची मागणी आहे. तरी,सदर प्रकरणी वैयक्तिकरित्या लक्ष घालून द्राक्ष निर्यातदार शेतक-यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात केलेली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक