शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ढगाळ हवामान, धुके अन् पावसाळी वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:51 IST

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देलागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.तर काही उन्हाळी कांद्याचे रोपे लागवडसाठी तयार झाली आहेत. ज्या शेतकºयांनी लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ते कांद्याचे पीक जोमात आहेत. तसेच लागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.उन्हाळी कांद्याच्या बियाण्याचे वाढलेल्या भाव व रोपाच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गव्हू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी मका व गव्हूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर काही शेतकºयांनी भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे.गव्हू व भाजीपालाची पिके जोमात आहेत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळी पडून त्यांच्या मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.त्यामुळे शेतकरीकांदा पिकावर महागडी अशी औषदाची फवारणी करीत आहे. या ढगाळ व धुकत वातावरणामुळे कांद्याची रोपेची अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात मरू लागली आहेत.या वर्षी गव्हू, मका व भाजीपाला पिकात वाढ झाली आहेत. परंतु या ढगाळ व धुकत वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तंबूरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकावर मावा रोगामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुंटते.चौकट....गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, गव्हू, मका पिकावर विविध रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन कांदा पीक नामशेष होणार की काय याची भीती शेतकरी वर्गा निर्माण झाल्याने सध्या या ढगाळ व पाऊसाजन्य वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा