शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

ढगाळ हवामान, धुके अन् पावसाळी वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:51 IST

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देलागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.तर काही उन्हाळी कांद्याचे रोपे लागवडसाठी तयार झाली आहेत. ज्या शेतकºयांनी लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ते कांद्याचे पीक जोमात आहेत. तसेच लागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.उन्हाळी कांद्याच्या बियाण्याचे वाढलेल्या भाव व रोपाच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गव्हू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी मका व गव्हूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर काही शेतकºयांनी भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे.गव्हू व भाजीपालाची पिके जोमात आहेत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळी पडून त्यांच्या मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.त्यामुळे शेतकरीकांदा पिकावर महागडी अशी औषदाची फवारणी करीत आहे. या ढगाळ व धुकत वातावरणामुळे कांद्याची रोपेची अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात मरू लागली आहेत.या वर्षी गव्हू, मका व भाजीपाला पिकात वाढ झाली आहेत. परंतु या ढगाळ व धुकत वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तंबूरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकावर मावा रोगामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुंटते.चौकट....गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, गव्हू, मका पिकावर विविध रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन कांदा पीक नामशेष होणार की काय याची भीती शेतकरी वर्गा निर्माण झाल्याने सध्या या ढगाळ व पाऊसाजन्य वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा