शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामान, धुके अन् पावसाळी वातावरणामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:51 IST

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.

ठळक मुद्देलागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.

खामखेडा : गेल्या दोन- तीन दिवसांपासून खामखेडा परिसरात ढगाळ, धुके व पाऊसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.चालू वर्षी खरीप हंगामातील पिके परतीच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्याचा शेतातील मका, बाजरी व लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान केले होते. तरीही शेतकºयाने नव्याने उन्हाळी कांद्याचे बियाणे आणून कांद्याचे रोपे तयार केली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे.तर काही उन्हाळी कांद्याचे रोपे लागवडसाठी तयार झाली आहेत. ज्या शेतकºयांनी लवकर उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. ते कांद्याचे पीक जोमात आहेत. तसेच लागवडीसाठी तयार असलेले उन्हाळी कांद्याचे रोपही चागली तयार झाली आहेत.उन्हाळी कांद्याच्या बियाण्याचे वाढलेल्या भाव व रोपाच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गव्हू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे या वर्षी मका व गव्हूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच बरोबर काही शेतकºयांनी भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड केलेली आहे.गव्हू व भाजीपालाची पिके जोमात आहेत. परंतु गेल्या दोन- तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळी पडून त्यांच्या मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.त्यामुळे शेतकरीकांदा पिकावर महागडी अशी औषदाची फवारणी करीत आहे. या ढगाळ व धुकत वातावरणामुळे कांद्याची रोपेची अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात मरू लागली आहेत.या वर्षी गव्हू, मका व भाजीपाला पिकात वाढ झाली आहेत. परंतु या ढगाळ व धुकत वातावरणामुळे गव्हाच्या पिकावर तंबूरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकावर मावा रोगामुळे भाजीपाला पिकाची वाढ खुंटते.चौकट....गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पाऊसामुळे कांदा, गव्हू, मका पिकावर विविध रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन कांदा पीक नामशेष होणार की काय याची भीती शेतकरी वर्गा निर्माण झाल्याने सध्या या ढगाळ व पाऊसाजन्य वातावरणामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा