शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वीज कंपनीवर शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:53 IST

वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवळा तालुका आढावा बैठक : शेतकरी आक्रमक; तीन आवर्तनाची मागणी

देवळा : वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तक्रारींचा पाऊस पाडला. खडकतळे, तिसगाव, गिरणारे येथे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली. वितरण कंपनीबाबत येणाºया तक्रारी पाहता गुरुवारी (दि.२०) वीज कंपनीच्या अधिकाºयांसह स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.गिरणा उजव्या कालव्याला तीन आवर्तने देण्याची मागणी मेशी, डोंगरगाव येथील सरपंचांनी केली. यावेळी तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभाग, वीज वितरण कंपनी, बांधकाम विभाग आदी विभागांविषयी तक्रारी करण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे निषेध व्यक्त करून सभात्याग केला. यावेळी प्रभारी प्रांत अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, यशवंत सिरसाठ, मुख्य अधिकारी संदीप भोळे, सहायक निबंधक सुजय पोटे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, उपसभापती धर्मा देवरे, केशरबाई आहिरे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. चिंचवे व डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तसेच तालुक्यात पशुधन अधिकाºयांची रिक्त असलेली पाच पदे भरण्याची मागणी करण्यात आली.तालुक्यात ग्रामसेवक व तलाठी यांची काही पदे रिक्त असल्यामुळे दोन ते तीन गावांचे काम एका कर्मचाºयास पहावे लागते. यामुळे मोठी गैरसोय होते. या कर्मचाºयांची इतर गावांत प्रभारी नेमणूक करताना त्यांचे त्या गावातील कामकाजाचे दिवस ठरवून देण्याची सूचना आमदार आहेर यांनी केली.घरकुल योजनांची उद्दिष्ट्ये दिली जात नसल्याची सरपंच दयाराम सावंत यांनी तक्रार केली. गटविकास अधिकारी देशमुख यांनी यासंबंधी प्रस्ताव दाखल नाहीत असे सांगितले. यावर पंचायत समिती योजनांची उद्दिष्ट्य ग्रामपंचायतींना देणार नसेल तर प्रस्ताव कोठून दाखल होतील, असा सवाल करत आमदार आहेर यांनी पंचायत समितीच्या अधिकाºयांना धारेवर धरले. यशवंत सिरसाठ यांनी आभार मानले.सिंगल फेज योजना राबविण्याची मागणीमेशी व देवपूर पाडे शिवारात सिंगल फेज योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. निविदा काढूनही वीज कंपनी खांब देत नसल्यामुळे दूर अंतरावरून केबल टाकून वीजपंप चालवावे लागतात. रोहित्र जळाल्यानंतर नवीन रोहित्र वेळेवर मिळत नाही, अशी तक्र ार चिंचवेचे सरपंच रवींद्र पवार यांनी केली. फेबुवारी व एप्रिल महिन्यातील सिंचनाची दोन आवर्तने दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाण्यावर तिसरे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिली. नागील नाला ते मेशी पाझर तलाव क्र . १ पोटचारीस मान्यता मिळावी, अशी मागणी केदा सिरसाठ यांनी केली. कृषी विभागाचे कृषी सहायक हे ग्रामसभांना उपस्थित राहत नसल्याची तक्र ार करण्यात आली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी