शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात उभी फूट : नाशिक 1 मार्चच्या संपातून बाहेर, सूकाणू सदस्यांचा समिती विसर्जित केल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 14:57 IST

पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसऱ्या गटाने सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात विविध चढउतारानंतर उभी फूट सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा 1 मार्च 2018 च्या संपातून नाशिक बाहेर नुकसान टाळण्यासाठी संप हाणून पाडण्याचा इशारा

नाशिक : पुनतांबे येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 1 जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या माध्यमातून राज्यभरात उभे राहिलेल्या आंदोलनात विविध टप्प्यावर चढउतारानंतर अखेर उभी फूट पडली आहे. पुनतांब्यांच्या समितीने 3 जूनच्या मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत संपातून माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुढे हा संप पुढे नेटाने चालवत सूकाणू समितीची स्थापना केली होती. पंरतु, आता नाशिकमधीलच एका गटाने 1 जानेवारी 2018ला सूकाणू समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे नियोजन केले असताना दुसऱ्या गटाने सूकाणू समितीती विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आंदोलनाचे केंद्र बनलेल्या नाशिकमधूनच शनिवारी (दि.30) शेतकरी आंदोलनात उभी फूट पडली आहे.पंडित कॉलनीत झालेल्या बैठकीत सुकाणू समिती सदस्य हंजराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर कैलास खांडबहाले यांनी विविध शेतकरी संघटनांसह सामाजिक संघटनांची बैठक घेऊन सूकाणू समिती विसर्जित करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथील बैठकीत झालेल्या 1 मार्चपासून संप पुकारण्याच्या निर्णयालाही या बैठकीत विरोध करण्यात आला आहे. पुणतांबे येथील येथील शिष्ट्मंडळाने शासनाशी केलेली तडजोड मान्य न झाल्याने नशिक येथील संयोजने समितीने निर्णायक बैठक घेऊन शेतकऱ्यांचे आंदोलन पुढे नेण्याचा आणि या आंदोलनाचा राज्यव्यापी करण्याचा निर्धार करीत 5 जून 2017 रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून सूकाणू समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रयत्नातू शासनाला अंशता का होईना कजर्मुक्ती देण्यास भाग पाडल्याचा दावा या समितीच्या सदस्यांनी केला आहे. परंतु, नजिकच्या काळात सुकाणू समितीचे कामकाज दिशाहीन झाल्याची कबुलीही देत समितीच्या सदस्यांनी मूळ संयोजन समिती, कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काही ठराविक संधीसाधू व्यक्ती निर्णय जाहीर करीत असल्याने आंदोलनाची मूळ संयोजन समिती म्हणून राज्याची सूकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याचे घोषित केले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNashikनाशिक