शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक

By admin | Updated: January 30, 2016 22:23 IST

’येवला : पिण्याच्या नावाखाली शेतीला घरघर

येवला : शेतीच्या पाण्यासाठी निर्माण केलेली धरणे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होऊ लागल्याने परिसरातील शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची चोरी करण्यास शासन भाग पाडत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाइपलाइनद्वारे व्यवस्था करावी, परंतु शेतकऱ्याला पाणीचोर ठरवून केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याचे शेतकरी नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.हक्काचे पाणी शेतकऱ्याला मिळत नाही व लाखो रु पये खर्च करून पिके जळत आहेत. त्यामुळे शेतकरी पाणीचोरी करणारच ही परिस्थिती शेतकऱ्याला सहन न झाल्यास अखेर ताकदीच्या जोरावर पाणी घेतल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. करंजवन १७०० दलघफू, पालखेड १५० दलघफू, ओझरखेड व वाघाड यामधील शेतीसाठी आरक्षित साठा एवढे सारे पाणी असताना एप्रिल व जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मिळणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी पाणी चोरले, अशी हाकाटी पिटली जात आहे. हे योग्य नाही. साठवण तलाव होण्याअगोदर १९९६ पूर्वीपासून या परिसरात शेती फुलविली जाते आहे. छोटे-मोठ्या बागाही उभ्या केल्या गेल्या; परंतु सध्या पिण्याच्या पाण्याची ओरड करून येथील शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडणे, मोटारी जप्त करणे हा उद्योग अयोग्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शेतपंपाचे वीज कनेक्शन तोडणे ही कृती असमर्थनीय असून, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून पाण्याचा भाव वाढविण्याची चर्चादेखील परिसरात आहे. हजार रुपये भावाचा डोंगळा पाच हजारांवर गेल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीशिंदे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)