शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 8:44 PM

नांदूरशिंगोटे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा धास्तावला आहे. बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत आहे. ऐन थंडीच्या दिवसांत बदलत्या हवामानामुळे दररोज वेगवेगळ्या ऋतुंचा अनुभव येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

बदलत्या वातावरणाचा सरळ रब्बी हंगामातील हरभरा, गहू, कांदा, मका आदी पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत असल्याने कधी पाऊस तर कधी धुके, तर दिवसभर कडक उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणाचा अनुभव येत आहे. नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्याने परिसरात पाणीटंचाई नाही. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणातील बदल पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला आहे. वातावरणात कमालीचा गारठा व रोगट परिस्थिती असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. शेतकऱ्यांनी महागडी कांदा रोपे विकत घेऊन बियाणे तयार केले होते. त्यानंतर, कांदा लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.अनियमित वीजपुरवठाएकीकडे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही, तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे महागडी फवारणीचे औषधे घ्यावी लागत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. या वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने, सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणाचा कांदा पिकांबरोबरच अन्य शेती मालावर परिणाम होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती