शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

पावसाअभावी पेरण्या लांबणीवर राजापूर परिसरातील शेतकरी चितांतूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 9:06 PM

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.

ठळक मुद्देनक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.राजापूर येथे मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या आहे. राजापूर सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यावर्षी बियाणे खते औषधे विक्रेत्यांकडे शांतता आहे.त्यामुळे बळीराजासह व्यापारी शेतमजूर नोकरदार वर्ग यांच्या नजरा वरूणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आदा नक्षत्रास सुरवात झाली आहे. परंतु आद्रा नक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.आकाशात ढग दाटून येतात तोच वारा सुटून ढग कूठच्या कूठे वाहून जातात. त्यामुळे बळीराजाच्या आशेची निराशा होते. गेल्या वर्षी राजापूर परिसराती जून महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत.या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिने हे या गावाला टॅँकरद्वारेच तहान भागवावी लागते. पण मागच्या वर्षी शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहत्ेत. काही वर्षापुर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा त्यामुळे मृगाच्या पावसावर पेरण्या उरकल्या जायच्या, मात्र निसर्गाच्या वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतीत आहे.