शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

तोड कामगारांअभावी ऊस शेतातच पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:36 IST

चांदोरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चांदोरी :(आकाश गायखे)  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदाकाठ भागात मागील वर्षी चांगला प्रमाणात पाऊस झाला. त्याबरोबरच महापुराचादेखील फटका बसला. पाणी मुबलक असल्यामुळे करंजगाव, चांदोरी, सायखेडा, कोठुरे, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, भुसे, नांदूरमधमेश्वर, लालपाडी, दारणा सांगवी, चाटोरी, भेंडाळी, म्हाळसाकोरे, तामसवाडी आदी गावात ऊस लागवड केली जाते.गोदाकाठच्या या गावातील भागांमध्ये काळ्या जमिनीचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी उसाचीमोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बऱ्याच दिवसांपासून रासाका व निसाका हे दोन साखर कारखानेकाही वर्षांपासून बंद असल्यामुळे मागील काही वर्षांपासून ऊस उत्पादक पर्याय म्हणून रसवंतीसाठी लागणारा नरम ऊस व रसवंतीसाठी लागणाºया उसाची लागवड करीत आहेत.----------------------------------रसवंतीगृहासाठीचा ऊसही अडचणीत४रसवंतीगृहासाठी लागणारा ऊस साधारण दहा ते अकरा महिन्यात रस तयार करण्यासाठी तयार होतो तर त्यासाठी एकदम सरळ न पडलेला असाच ऊस फक्त रसवंतीसाठी पसंत केला जातो, पण मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. अजूनही परत १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने तोडणीसाठी आलेला ऊस तोडता येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कारण रसवंतीसाठी लागवड केलेल्या उसाचे क्षेत्र साधारण १० ते ११ महिन्यांत शेत खाली होते व साधारण ३५०० ते ४००० रु पये टन याप्रमाणे बांडीसह दर मिळतो व थोड्याच दिवसांत बºयापैकी पैसे मिळून शेतीसाठी भांडवल उपलब्ध होते, पण हाच ऊस तोडता येत नसल्याने आता पुढील हंगामातील पिकासाठी भांडवल उभे करायचे कसे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.-----------------------------तालुक्यातील निफाड व रानवड दोन्ही कारखाने बंद असल्याने अगोदरच आपल्या उसाला इतर कारखाने त्यांच्या सवडीत नेतात. त्यात कोरोनामुळे इतर कारखानेदेखील लवकरच बंद झाले आणि रसवंती पण बंद असल्याने बºयाच शेतकºयांचा ऊस शेतात तसाच आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. म्हणून मायबाप सरकारने शेतकºयांना मदतीचा हात देऊन उभारी देण्याची गरज आहे. तेव्हाच तो पुढील हंगामात टिकू शकतो.- भगवान भोज, ऊस उत्पादक शेतकरी------------------------------------------यंदा लॉकडाउन असल्याने चांगल्या दर्जाचा ऊस हा अतिशय तुटपुंज्या दरात घ्यावा लागत आहे. रसवंती गृह बंद असल्याने ऊस विक्ती ची महत्वाची बाजार पेठ बंद असल्याने मोठी आर्थिक झळ शेतकरी व स्थानिक व्यापारी वर्गाला बसत आहे.- शुभम बोरस्ते,

----------------------------ऊस व्यापारी, चांदोरी ऊस तोडणार तरी कधी ?कोरोनाच्या धर्तीवर तिसºया टप्प्यातील संक्र मण तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन वाढविला असून, त्याचा फटका उसाबरोबरच द्राक्षपंढरीला बसला आहे. त्याचबरोबर, डाळिंब, कांदा, आंबा, मोसंबी , संत्री, टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला पिकांबरोबर ऊस शेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. ऊस न तुटल्यास जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू नसल्याने पुढील येणाºया काळात कारखान्यांच्या भरोशावर साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखर कारखानेचालू होतील त्यावेळेस ते तोडले जातील, परंतु तोपर्यंत उसाच्या वजनात घट येईल, असे उत्पादकांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक