शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तोड कामगारांअभावी ऊस शेतातच पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:36 IST

चांदोरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चांदोरी :(आकाश गायखे)  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे मजूर नसल्याने तोडणीसाठीचा ऊस शेतातच पडून असून उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वजनातही घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदाकाठ भागात मागील वर्षी चांगला प्रमाणात पाऊस झाला. त्याबरोबरच महापुराचादेखील फटका बसला. पाणी मुबलक असल्यामुळे करंजगाव, चांदोरी, सायखेडा, कोठुरे, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, भुसे, नांदूरमधमेश्वर, लालपाडी, दारणा सांगवी, चाटोरी, भेंडाळी, म्हाळसाकोरे, तामसवाडी आदी गावात ऊस लागवड केली जाते.गोदाकाठच्या या गावातील भागांमध्ये काळ्या जमिनीचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी उसाचीमोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बऱ्याच दिवसांपासून रासाका व निसाका हे दोन साखर कारखानेकाही वर्षांपासून बंद असल्यामुळे मागील काही वर्षांपासून ऊस उत्पादक पर्याय म्हणून रसवंतीसाठी लागणारा नरम ऊस व रसवंतीसाठी लागणाºया उसाची लागवड करीत आहेत.----------------------------------रसवंतीगृहासाठीचा ऊसही अडचणीत४रसवंतीगृहासाठी लागणारा ऊस साधारण दहा ते अकरा महिन्यात रस तयार करण्यासाठी तयार होतो तर त्यासाठी एकदम सरळ न पडलेला असाच ऊस फक्त रसवंतीसाठी पसंत केला जातो, पण मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. अजूनही परत १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने तोडणीसाठी आलेला ऊस तोडता येत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कारण रसवंतीसाठी लागवड केलेल्या उसाचे क्षेत्र साधारण १० ते ११ महिन्यांत शेत खाली होते व साधारण ३५०० ते ४००० रु पये टन याप्रमाणे बांडीसह दर मिळतो व थोड्याच दिवसांत बºयापैकी पैसे मिळून शेतीसाठी भांडवल उपलब्ध होते, पण हाच ऊस तोडता येत नसल्याने आता पुढील हंगामातील पिकासाठी भांडवल उभे करायचे कसे ? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.-----------------------------तालुक्यातील निफाड व रानवड दोन्ही कारखाने बंद असल्याने अगोदरच आपल्या उसाला इतर कारखाने त्यांच्या सवडीत नेतात. त्यात कोरोनामुळे इतर कारखानेदेखील लवकरच बंद झाले आणि रसवंती पण बंद असल्याने बºयाच शेतकºयांचा ऊस शेतात तसाच आहे. त्यामुळे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. म्हणून मायबाप सरकारने शेतकºयांना मदतीचा हात देऊन उभारी देण्याची गरज आहे. तेव्हाच तो पुढील हंगामात टिकू शकतो.- भगवान भोज, ऊस उत्पादक शेतकरी------------------------------------------यंदा लॉकडाउन असल्याने चांगल्या दर्जाचा ऊस हा अतिशय तुटपुंज्या दरात घ्यावा लागत आहे. रसवंती गृह बंद असल्याने ऊस विक्ती ची महत्वाची बाजार पेठ बंद असल्याने मोठी आर्थिक झळ शेतकरी व स्थानिक व्यापारी वर्गाला बसत आहे.- शुभम बोरस्ते,

----------------------------ऊस व्यापारी, चांदोरी ऊस तोडणार तरी कधी ?कोरोनाच्या धर्तीवर तिसºया टप्प्यातील संक्र मण तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन वाढविला असून, त्याचा फटका उसाबरोबरच द्राक्षपंढरीला बसला आहे. त्याचबरोबर, डाळिंब, कांदा, आंबा, मोसंबी , संत्री, टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला पिकांबरोबर ऊस शेतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. ऊस न तुटल्यास जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू नसल्याने पुढील येणाºया काळात कारखान्यांच्या भरोशावर साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये साखर कारखानेचालू होतील त्यावेळेस ते तोडले जातील, परंतु तोपर्यंत उसाच्या वजनात घट येईल, असे उत्पादकांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक