शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:16 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले.

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले. बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बंद असलेले बाजार समितीत कांदा व धान्य लिलावाला सोमवारी सुरूवात झाली. सोमवारी कांद्याला जास्तीतजास्त ९७० रु पये ,सरासरी ७५० रु पये तर कमीतकमी ४०० रु पये मिळाला प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहीर झाला.कळवण येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे शेतकर्यांच्या भावना कळवाव्यात अशी विनंती केली़ गेल्या काही दिवसांपासून कांद्याबरोबरच शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाजीपाल्याचे भावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतातूर आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जगन्नाथ पाटील, घनश्याम पवार, विनोद खैरनार,प्रविण जाधव,दादाजी जाधव हंसराज वाघ, माणिक देवरे, संजय शेवाळे,कौतिक गांगुर्डे यासह आदी शेतकरी उपस्थित होते.-------------------------------प्रतिकिलो २० रु पये दर देण्याची मागणीकळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि मधला जो दुरावा आहे तो शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अदा करावा अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना दिले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ उपस्थित होते. कांदा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी देविदास पवार यांनी केली.शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून न्याय मिळवून द्यावा.

टॅग्स :Nashikनाशिक