शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:16 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले.

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले. बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बंद असलेले बाजार समितीत कांदा व धान्य लिलावाला सोमवारी सुरूवात झाली. सोमवारी कांद्याला जास्तीतजास्त ९७० रु पये ,सरासरी ७५० रु पये तर कमीतकमी ४०० रु पये मिळाला प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहीर झाला.कळवण येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे शेतकर्यांच्या भावना कळवाव्यात अशी विनंती केली़ गेल्या काही दिवसांपासून कांद्याबरोबरच शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाजीपाल्याचे भावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतातूर आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जगन्नाथ पाटील, घनश्याम पवार, विनोद खैरनार,प्रविण जाधव,दादाजी जाधव हंसराज वाघ, माणिक देवरे, संजय शेवाळे,कौतिक गांगुर्डे यासह आदी शेतकरी उपस्थित होते.-------------------------------प्रतिकिलो २० रु पये दर देण्याची मागणीकळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि मधला जो दुरावा आहे तो शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अदा करावा अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना दिले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ उपस्थित होते. कांदा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी देविदास पवार यांनी केली.शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून न्याय मिळवून द्यावा.

टॅग्स :Nashikनाशिक