शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात ३१ जुलैपर्यंत टॅँकरला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 18:29 IST

सिन्नर : तालुक्यात ३० जूनअखेर टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याला मुदतवाढ मिळण्यास विलंब झाला होता. त्यामुळे टॅँकरवर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने टॅँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील २७ गावे व ३०२ वाड्या-वस्त्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा तालुक्याला तीव्र टंचाईचा सामना करावा लागला. आरंभी माणसांबरोबरच जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र तालुक्यात आडवाडी, गुळवंच व खापराळे अशा तीन ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला. ३० जूनअखेरीस तालुक्यातील २७ गावे ३०२ वाड्या-वस्त्यांना ५८ खासगी व सहा शासकीय अशा ६४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. संबंधित गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी १८३ खेपा मंजूर असल्यातरी प्रत्यक्षात १५५ खेपा टाकणे शक्य होत होते. मुदतवाढीचे कुठलेही लेखी आदेश न मिळाल्याने पंचायत समितीने टॅँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा १ जुलैपासून बंद केला होता. त्यामुळे पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून असलेल्या गावांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने टॅँकर सुरूच ठेवण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. तथापि, या मागणीला विलंब चार दिवसांपासून टॅँकर बंद होते. दरम्यान, तालुक्यात समाधानकारक पाऊस नसला तरी रिमझिम पावसाने का होईना टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे ६७ वरून टॅँकरची संख्या ६४ वर आली आहे. जोरदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा तालुकावासीय करीत आहेत. तालुक्यातील नि-हाळे, गुळवंच, सुळेवाडी, धोंडवीरनगर, यशवंतनगर, बारागाव पिंप्री, सोनारी, पाटपिंप्री, फर्दापूर, घोटेवाडी, फुलेनगर, शहापूर, जयप्रकाशनगर, डुबेरे, धुळवड, देवपूर, खोपडी, डुबेरेवाडी, आटकवडे, वडगाव-सिन्नर, खापराळे, पास्ते, हरसुले, सोनांबे, चंद्रपुर, कोमलवाडी या २७ गावांसह ३०२ वाड्या-वस्त्यांना ६४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वारेगाव, पाथरे खुर्द व पाथरे बुद्रुक या तीन गावांच्या शिवरात पाऊस बऱ्यापैकी झाल्याने तेथील टॅँकर बंद करण्यात आले आहेत. मध्यम पावसामुळे ब-याच गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाल्याचे पंचायत समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा काही गावांमध्ये टॅँकरद्वारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे.