शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

मुदतवाढ तर मिळाली, परंतु महापौराची कारकिर्द उजाळेल?

By संजय पाठक | Updated: August 17, 2019 23:56 IST

संजय पाठक, नाशिक - अखेरीस महापौर रंजना भानसी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला अवघा महिना बाकी असताना त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ...

ठळक मुद्देअडीच वर्षात जेमतेम कामगिरीआयुक्तांच्या संघर्षात गेले वर्षेमहत्वाचे सर्वच निर्णय अंमलबजावणीविना

संजय पाठक, नाशिक- अखेरीस महापौर रंजना भानसी यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीला अवघा महिना बाकी असताना त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे त्या नशिबवान ठरल्या खऱ्या परंतु उर्वरीत कालावधीचा लाभ घेऊन त्या नक्की काय करतात, यावर नाशिककरांचे नशिब कसे आहेत ते ठरू शकेल. कोणतीही कल्पक योजना नाही की नाविन्य नाही आहे तेच काम पुढे नेण्याचे कसब त्यांनी दाखवले खरे परंतु त्यातून भाजपाच्या प्रतिष्ठेचा देखील प्रश्न निर्माण झाला. आता तीन महिने मिळाले आहेच, त्याचा त्या नाशिककरांसाठी काय फायदा करून देतात, त्यावर पक्षाच्या कामगिरीचे मुल्यमापन होणार आहे.

महापौरपदाचे आरक्षण अनुसूचीत जमातीसाठी मिळाल्याने पक्षातील ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर रंजना भानसी यांना संधी मिळाली. ती अपेक्षीत होती. परंतु कामगिरीसाठी मात्र आरक्षण किंवा अनारक्षण असे काहीही नसते. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना अफाट संधी होती. अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने महापालिकेत ज्या पध्दतीचे कामकाज त्यांनी करणे अपेक्षीत होते त्याबाबत मात्र भ्रमनिरास झाला असेच म्हणावे लागेल.

नव्याचे नऊ दिवस म्हणून पहिले वर्ष सरले आणि दुसºया वर्षी तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा कब्जा घेतला. त्या दिवसापासून आजपर्यंत महापौर सावरल्या नाहीत. आयुक्त परस्पर निर्णय घेतात असा दावा त्यांनी केला परंतु त्यांना सभागृहात निर्णय घेण्याचे आधिकार असूनही त्यात तरी असा कोणता धाडसी निर्णय घेतला. केवळ मुंढे यांच्याशी स्पर्धा करायची म्हणून त्यांनी महापौर आपल्या दारी उपक्रम राबविला गेला. दोन भेटीत दौरा संपलाच परंतु मुंढे गेल्यानंतर त्यावर महापौरांनी चर्चाही केल्या नाहीत. करवाढ या एका विषयावरून महापौरांनी मुंढे यांच्या विरोधात आपल्याकडे नाशिककरांना वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंढे यांच्या बदलीसाठी प्रतिष्ठापणाला लाऊन देखील महापौर हा प्रश्न सोडू शकल्या नाहीत. आयुक्त गमे यांनी मुंढे यांचाच निर्णय कायम ठेवल्याने महापौरांचा संघर्ष नाशिककरांसाठीच होता काय असा देखील प्रश्न पडतो.

महापौरांच्या याच कारकिर्दीत बेकदायदा धार्मिक स्थळे आणि तसेच महापालिकेने सेवाभावी मंडळांना दिलेल्या समाज मंदिर आणि अभ्यासिकांचा विषय ऐरणीवर आला परंतु त्यावर देखील कोणताही तोडगा त्या काढु शकल्या नाही. मार्च महिन्यात महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाली त्यात मुलींच्या जन्मावर मनपाकडून एफडी करण्याची अनोखी सुकन्या योजना त्यांनी जाहिर केली. वस्तुत: महापालिका सोडाच अनेक ग्रामपंचायतींनी देखील ही योजना राबविली आहे त्याची नक्कल करून देखील अद्याप योजना अमलातच आलेली नाही.

मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना जूनीच होती. बस सेवा ही महत्वांकांक्षी प्रकल्प म्हणावा की संकट हे नंतर कळणार असल्याने त्यावर महापौरांचे श्रेय की अपश्रेय हा विषय नंतरच ठरू शकेल. स्मार्ट सिटीच्या बाबतीत देखील हाच प्रकार आहे कंपनीचे कामकाज इतके वादग्रस्त ठरले आहे की स्मार्ट सिटी शाप की वरदान असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

एकुणच महापौरांच्या कारकिर्दीत त्या ठोस निर्णय घेऊ शकल्या नाहीत की त्यांना तसे करण्यासाठी भाजपाचे स्थानिक आमदार आणि अन्य पदाधिकारीही प्रवृत्त करू शकले नाहीत. त्यामुळे या साºयाचे अपयश केवळ महापौरांच्याच पदरी नाही तर महपालिकेत हस्तक्षेप करणारे आमदारही तितकेच जबाबदार असून महापौरांचा सोयीने वापर करून घेणारे नगरसेवक बंधूही तितकेच अपयशाचे धनी आहेत. आता तीन महिन्यांपैकी दोन महिने विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारासंहिते जाणार असून महिनाभरात धडकेबाज कामगिरी करण्याची महापौरांची तरी मानसिकता दिसत नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRanjana Bhansiरंजना भानसीBJPभाजपा