शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:51 PM

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.साधारण जूलै महिन्याच्या मध्यावर दरवर्षी भाताची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानुसार याही वर्षी नियोजन केले मात्र पाऊस लांबल्याने रोपे तयार असली तरी लावणीसाठी शेतात पाणी साचले नसल्याने शेतकर्यांना इकडून तिकडून पाणी आणून लावणी करावी लागत आहे. डोंगर उतारावर असलेले नागलीची रोपे करपू लागली आहेत. रोपे वाचवण्यासाठी डोक्यावर हंडयाव्दारे पाणी आणून शेतकरी धडपड करत आहेत. अजून काही दिवस पावसाने दडी दिल्यास पेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.--------------------कृषी विभागाच्या या वर्षी पेठ तालुक्यातील शेतकर्यांना आधूनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत भात रोपवाटिका विकिसत करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताची आवणी लांबणीवर पडल्यास त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यांना जलसिंचनाची सुविधा आहे. त्या शेतकºयांनी भाताची लावणी सुरू करावी.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ----------------------------------दरवर्षी आषाढी एकादशीला भाताची लावणी करून शेतकरी वारीला जात होते. या वर्षी वारी बंद असूनही पावसामुळे भाताची लावणी करता येत नाही. शेतात भात, नागाली सह फळझाडांची रोपे तयार झाली आहेत. रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नात घट होते. त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.-रतन महाले,शेतकरी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक