शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान हवे

By bhagyashree.mule | Updated: February 27, 2018 00:11 IST

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक शाळांना प्रोत्साहन आणि मराठी माध्यमिक शाळांचे खच्चीकरण, शाळा बंद पाडणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुंतवणे, मराठी भाषेबद्दल पालकांमध्येच असलेली नकारात्मक वृत्ती, इंग्रजी माध्यमाचा सोस, शासन स्तरावरही मराठी भाषेच्या वाढीबाबत निरुत्साह यामुळे मराठी भाषा मागे पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक शाळांना प्रोत्साहन आणि मराठी माध्यमिक शाळांचे खच्चीकरण, शाळा बंद पाडणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामांमध्ये गुंतवणे, मराठी भाषेबद्दल पालकांमध्येच असलेली नकारात्मक वृत्ती, इंग्रजी माध्यमाचा सोस, शासन स्तरावरही मराठी भाषेच्या वाढीबाबत निरुत्साह यामुळे मराठी भाषा मागे पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विपुल साहित्याची उपलब्धता, प्रत्यक्ष साहित्यिकांचा, तज्ज्ञांचा सहवास, साधनांची सहजतेने होणारी उपलब्धता, असे असूनही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मराठी भाषा सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठी भाषा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेकडे अभिमानाने पहावे, मराठीचा दैनंदिन जीवनात वापर वाढवावा, मराठी साहित्याचे आवडीने वाचन केले जावे, सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा, घरातून भाषेचे संस्कार केले जावे, वाचनालयांची संख्या वाढवावी, मराठी शाळांमधून मोफत शिक्षण मिळावे, आणि नुसते वाचता-बोलता आले म्हणजे मराठी भाषा आली हा गैरसमज मनातून काढून टाकून मराठी भाषा शास्त्रशुद्ध पद्धतीने, व्याकरणासह साहित्याच्या सखोल वाचनाने शिकावी लागते, आत्मसात करावी लागते याचा स्वीकार व अंमलबजावणी व्हावी, असे मत ज्येष्ठ कवी, लेखक किशोर पाठक, नरेश महाजन, डॉ. मोहिनी पेठकर, प्रा. लता पवार, प्रा. वेदश्री थिगळे, अभिनेता दिग्दर्शक सचिन पाटील, नथुजी देवरे, पूनम वाघ यांनी ‘लोकमत’च्या विचार- विमर्शच्या व्यासपीठावर व्यक्त केले.मातृभाषा बोलताना कमीपणा वाटायला नको!मराठी भाषा टिकावी, वाढावी यासाठी सरकार खास असे प्रयत्न करताना दिसत नाही. मराठी शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मात्र अनुकूल वातावरण तयार करून दिले जात आहे. मराठी शाळांमध्ये मुलांना बसायला बेंच नाही, बस्कर नाही, प्यायला पाणी नाही, मदतीला शिपाई, क्लर्क नाही, शिक्षकांवर अध्यापनाबरोबरच अशैक्षणिक कामांचा बोजा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठी शाळा यांच्यात विरोधाभास दिसतो. विद्यार्थ्यांना सौम्य प्रकारची शिक्षा करायची नाही पण विद्यार्थी अभ्यासात मागे नाही राहिले पाहिजे, अशी अपेक्षा समाजाकडून केली जाते. त्यामुळे सत्य घटनांचे अपवाद वगळता बºयाचशा शाळांमध्ये शिक्षकांना काढून टाकण्यासाठीच त्यांनी केलेल्या शिक्षेचा बाऊ करून प्रकरण वाढवले जाते. अशा परिस्थितीत मराठी शाळा सुरू आहेत. शाळेच्या शिक्षकाला सन्मान मिळाला पाहिजे. समाजाकडून मराठी भाषेला प्रतिष्ठा दिली जात नाही. हिंदी सिनेमात मराठी भाषा बोलणारी बाई कामवाली दाखवली जाते. मराठी भाषा गांभीर्याने अभ्यासली गेली पाहिजे. अवांतर वाचन सक्तीचे केले गेले पाहिजे. तरच मराठी भाषा टिकेल, वाढेल. - प्रा. लता पवार, आरंभ महाविद्यालयमराठीबाबत शहरापेक्षा खेड्यातले चित्र आशादायीशहरी भागापेक्षा खेड्यापाड्यांमध्ये मराठीची स्थिती चांगली, आशादायी असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. शासनाकडूनही मराठी भाषेसाठी चांगले प्रयत्न होत आहे. शासनाच्या भाषा संचालनालयाचे प्रतिनिधी पाहिल्यास त्यात मराठी माध्यमातून आयएएस परीक्षा दिलेल्या नामवंत व्यक्ती दिसून येतील. परदेशातील भारतीय आणि विशेषत: मराठी माणसे मराठी भाषेचे सर्वाधिक जतन करत आहेत. ते घरात आवर्जून मराठी बोलतात. त्यांची मुले शुद्ध मराठीत संवाद साधतात. याउलट भारतात मात्र मराठी मुलांना मराठी नीट वाचताही येत नसल्याचे दिसते आहे. मराठी भाषा असणाºया मुलांना दुसºया भाषेचे आकलन पटकन होते मग मराठी भाषेचे का होत नाही, याचा विचार पालकांनी केला पाहिजे. मराठी भाषा समृद्ध होती, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे मराठी भाषा लोप पावतेय, असा गळा काढण्याची गरज नाही. भाषा ही प्रयोगशील असते. आपण तोच प्रयत्न केला पाहिजे. मराठीचे प्रेम म्हणजे इंग्रजीचा दुस्वास नाही. इंग्रजी ही अनेक देशांशी संपर्क करण्याचा दुवा म्हणून आजवर काम केले पाहिजे. त्यामुळे दुवा इतकेच त्याचे महत्त्व ठेवावे आणि मराठी ही आपली मुख्य भाषा असावी.  - किशोर पाठक, ज्येष्ठ साहित्यिकमराठी भाषा जगवण्याची जबाबदारी प्रत्येकाचीमूल जन्मताच त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शोध सुरू होतो. घरात त्याची चर्चा सुरू होते. पण इंग्रजी माध्यमिक शाळेतील शिक्षण हे मुलांचे करिअर करेल पण मातृभाषेतून दिलेले शिक्षण हे माणसाचे जगणे समृद्ध करते. तो मातृभाषेतून शिकला तर अंतर्बाह्य व्यक्त होऊ शकेल. मराठी भाषेच्या पिछेहाटीस समाज जबाबदार आहे, असे म्हणून आपण मोकळे होतो. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, समाज ही आभासात्मक संकल्पना आहे. समाज करेल हे म्हणणेच चुकीचे आहे. ही सर्व जबाबदारी आपली आहे. आपणच मातृभाषेचा सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे. पोटासाठी करिअर आणि जगण्यासाठी भाषा ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. भाषेच्या संवर्धनासाठी मनापासून कृती करणारी यंत्रणा आपल्या शासनाकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. करिअरसाठी इंग्रजी शिकायला हरकत नाही पण त्याचा मातृभाषेतील साहित्य, नाटक, कविता, कथा यांचाही परिचय करून दिला पाहिजे. मराठी शाळा विकसित झाल्या पाहिजेत.  - नरेश महाजन, ज्येष्ठ साहित्यिकमराठीच्या सद्यस्थितीकडे सकारात्मकतेने बघामराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन एका मर्यादेपर्यंतच काम करू शकते. त्याच्यापुढची मोठी जबाबदारी समाजाची म्हणजेच आपल्या प्रत्येकाची आहे. शासनाकडून मराठी भाषाविषयक धोरण, चर्चासत्र, भिंगारसारख्या गावाची निर्मिती अशा अनेक स्तरावर काम सुरू आहे. त्यातून सकारात्मक वातावरण पहायला मिळते आहे. मराठी भाषेचे संवर्धन हजारो वर्षांपासून संत ज्ञानेश्वर, चक्रधर स्वामी आदी विविध महान व्यक्तींकडून केले गेले. ती साधना आजही अखंडितपणे सुरू आहे. नागरिक, प्रसारमाध्यमे, शिक्षक, प्राध्यापक, पालक, ज्येष्ठ नागरिक या साºयांनी मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाषेचे संस्कार घरातूनच झाले पाहिजे. मराठीत बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे या गोष्टी झाल्या पाहिजे. मराठीचा न्यूनगंड फेकून दिला पाहिजे. दोन उच्चशिक्षित मराठी माणसे भेटली की ती इंग्रजीत संवाद सुरू करतात. ते थांबल पाहिजे. सोशल मीडियावरही सध्या मराठीबाबत आशादायी चित्र दिसते आहे. मराठीत चांगले चांगले ब्लॉगही वाचायला मिळत आहे. मराठी भाषेने अवगत केलेले तंत्रज्ञानही कौतुकास्पद आहे. तरुणांकडून हे आशादायी चित्र दिसत आहे. मराठी भाषा दीर्घकाळ टिकणार, यात काही शंकाच नाही.  - डॉ. मोहिनी पेठकर, एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयमराठीचे वाचन वाढले पाहिजेमराठी मातृभाषा असणाºया राज्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढत चालले आणि मराठा शाळा बंद पडत चालल्या आहेत, याचे वाईट वाटते. मराठी शाळा-कॉलेजात शिक्षणाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचबरोबर तेथील शिक्षकांना आर्थिक मोबदलाही कमी दिला जातो. शिक्षक-मुले मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगतात. इंग्रजी माध्यमिक शाळात मराठी विषय असला तरी पुरेशा तासिकाही होत नाही. दर्जाही सांभाळला जात नाही. मराठी भाषेचे ज्ञान अद्ययावत ठेवत नाही. राज्यात ग्रंथालयांची स्थिती खराब आहे. जिथे ग्रंथ आहे तिथे वाचक नाही, जिथे वाचक आहे तिथे ग्रंथ नाही. ग्रंथालयातील वाचक सभासदांचे अवलोकन केल्यास ज्येष्ठ नागरिक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे प्रमाण सर्वाधिक दिसते. पण शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारवर्ग, व्यावसायिक, गृहिणी यांनी सध्या ग्रंथालयांकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते. प्रत्येक अभ्यासक्रमात मराठी भाषा हा विषय सक्तीचा असला पाहिजे. मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन वाढले पाहिजे. वाचनालयांची संख्या वाढली पाहिजे. सोशल मीडियावरचे वाचन आणि प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन केलेले वाचन यात खूप फरक आहे. तो तरुण पिढीने समजावून घेतला घेतला पाहिजे. मराठीत दर्जेदार साहित्य आहे. त्यांचे वाचन झाले पाहिजे. खेड्यापाड्यात वाचनालयांची संख्या आणि पुस्तकांची संख्या वाढली पाहिजे. ती जबाबदारी शहरातील मराठीप्रेमी नागरिकांची आहे.  - नथुजी देवरे, कार्यवाह, पंचवटी सार्वजनिक वाचनालयबालपणापासून मुलांवर व्हावे मराठीचे संस्कारमराठी भाषा मागे पडत चालली आहे, तिच्या संवर्धनासाठी काहीतरी केले पाहिजे अशी वेळ येणे हे मराठी भाषेचे दुर्दैव म्हणावे लागेल आणि ही वेळ आणण्यास आपणच कारणीभूत आहोत, याचाही प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मुलगा जन्माला येत नाही तोच त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमिक शाळेचा शोध घेतला जातो. मुलांनाच घरातल्या गोष्टींची ओळख इंग्रजीतून करून दिली जाते. मम्मी, पप्पा, अंकल, आंटी, फिश, स्पून, डॉग असे त्याला शिकवले जाते. मराठी भाषेचा न्यूनगंड वाटायला नको. मराठी भाषेच्या शिक्षकाकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघितले

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018