शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय पाणी बचाव समितीची स्थापना ;  नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:42 IST

मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी वाचविण्यासाठी सर्वपक्षीय पाणी बचाव समितीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता गंभीर असल्यामुळे पाणी वाचविण्यासाठी न्यायालय व शासन दरबारी लढा देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

नाशिक : मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी वाचविण्यासाठी सर्वपक्षीय पाणी बचाव समितीची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता गंभीर असल्यामुळे पाणी वाचविण्यासाठी न्यायालय व शासन दरबारी लढा देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.  भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे पुढाकार घेऊन सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर खासदार हेमंत गोडसे, आमदार नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, दीपिका चव्हाण, माजी आमदार जयंत जाधव यांची बैठक झाली. या बैठकीत फरांदे यांनी मेंढगिरी समितीचा अहवाल सदोष असल्याचे सांगून त्यातील त्रुटी मांडल्या. नाशिक जिल्हावासीय पाण्यासाठी भटकंती करीत असताना मराठवाड्याला पाणी देणे अन्यायकारक ठरणार असल्याचे सांगण्यात आले. पाण्यासारख्या प्रश्नावर राजकारण न आणता या विषयावर सर्वपक्षीय लढा देण्याचा विचार बोलून दाखविण्यात आला. प्रारंभी उत्तर महाराष्टÑ पाणी बचाव समिती स्थापन करण्याचा विचार पुढे आला परंतु त्या त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका अद्याप माहिती नसल्यामुळे तूर्त नाशिक जिल्ह्यापुरती ‘पाणी बचाव समिती’ स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेत पाणी बचाव समितीने प्रतिवादी होण्याचे व त्यामाध्यमातून न्यायालयाला पाण्याची सद्य:स्थिती पटवून देण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयातदेखील अशाच प्रकारे एक रिट याचिका दाखल करून औरंगाबाद उच्च न्यायालयात पाण्यासंदर्भात दाखल असलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्र्ग करण्यात यावी, अशी विनंती करण्याचे ठरविण्यात आले. न्यायालयाला गेल्या वेळचा अनुभव पाहता, मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे सरकार दरबारीदेखील दबाव टाकण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकानी जिल्ह्याची परिस्थिती घालण्याचे ठरले.दुष्काळाची दाहकता दाखवाबैठकीत जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर चर्चा होऊन सध्या भेडसावित असलेली दुष्काळाची दाहकता दर्शविण्याचे ठरविण्यात आले. शासनाकडून कृषी व महसूल खात्यावर दबाव टाकून नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न असून, त्यामाध्यमातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघातील दुष्काळाची दाहकता सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दबावाचा वापर करण्याचा त्याचबरोबर सरकारी यंत्रणा जुमानत नसेल तर त्यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याचा पर्याय ठेवण्यात आला.पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणारगोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून पाणी सोडण्यासाठी येत असलेला दबाव पाहता, लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. साधारणत: पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस यांची भेटीसाठी वेळ घेण्याचे ठरविण्यात आले व त्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर सोपविण्यात आली.हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब सानप यांची पाठजिल्ह्याचा पाणीप्रश्न गंभीर झालेला असताना या विषयावर बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप तसेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मात्र पाठ फिरविली. या दोघांबरोबरच जिवा पांडू गावित, अनिल कदम, निर्मला गावित, योगेश घोलप, राहुल अहेर यांनीही दूर राहणेच पसंत केले.केवळ ७७ टक्के साठामेंढगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या बैठकीत जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून सात टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला असून, त्या विरोधात नाशिक जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यात यंदा  ८३ टक्केच पाऊस झाला व धरणांमध्ये ७७ टक्केच पाणी असून, आठ तालुक्यांमध्ये आॅक्टोबरमध्येच पाण्याची टंचाई भासत असल्याने त्यात मराठवाड्याला पाणी सोडल्यास नाशिक जिल्हा तहाणलेला राहणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकMLAआमदारGovernmentसरकार