शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 9:13 PM

नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आपली वसाहत सुंदर वसाहत तसेच माझा कचरा माझी जबाबदारी अशा संकल्पना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियातही रूजवल्या आहेत. राज्यशासनाच्या पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्काराने गौरवांकित केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्याशी साधलेला संवाद...

ठळक मुद्दे मियावाकी पध्दत चांगलीचकचरा ही आपलीच जबाबदारीआपला परीसर स्वच्छ परिसर संकल्पनेची गरज

नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आपली वसाहत सुंदर वसाहत तसेच माझा कचरा माझी जबाबदारी अशा संकल्पना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियातही रूजवल्या आहेत. राज्यशासनाच्या पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्काराने गौरवांकित केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न :पर्यावरण संवर्धन या विषयात रूची कशी काय निर्माण झाली?निखारे : माझे बालपण आणि शिक्षण हे सर्वच निसर्गाच्या कुशीत झाले. वडील श्रीराम निखारे वनखात्यात होते. त्यांची चंद्रपूरला चांदा वेस्ट येथे नियुक्ती होती.त्यानंतर माझी शाळा आणि अन्य सर्व निसर्ग सानिध्यातच होते. ताडोबा येथील पस्तीस घराच्या परीसरातही होतो. घराच्या परसात असलेल्या फुल झाडांनी निसर्गाकडे अधिक ओढलो गेलो आणि त्यातूनच मग एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तेथेही वृक्षरोपण आणि कचरा व्यवस्थापन अशा प्रकारचे पर्यावरण पुरक काम करता आले.प्रश्न : मियावाकी पध्दतीचे वृक्षारोपण कसे अमलात आणले ?निखारे : जानेवारी २०१७ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रात मुख्य अभियंता म्हणुन रु जु झाल्यावर केंद्र परिसरात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण केले. १ एप्रिल २०१९ ला करु न एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल करण्यासाठी संकल्प २०१९अंतर्गत मियावाकी या जापनीज पध्दतीने ४७०० चौरसफुट जागेत २ बाय २ फुटाच्या अंतराने ४६ स्थानिक प्रजातिच्या एकुण ११०० झाडांची लागवड करण्यात आली. या पद्धतीने झाडांची वाढ जलद गतीने होते व ३० पट घनदाट जंगल तयार होते. त्यामुळे ३० टक्के पर्यंत कार्बनडाय आॅक्साईड शोषुन घेतला जातो.पर्यावरण संवर्धनासाठी व्रुक्षांच्या रोपांची मोठ्या प्रमाणात गरज भासते म्हणुन एकलहरे वसाहती मधील स्थापत्य विभागात १७ हजार ६८६ विविध प्रकारची रोपे तयार करणारी रोपवाटीका विकिसत करण्यात आली.

प्रश्न : हा परिसवरच पर्यावरण स्नेही कसा केला?निखारे: मी केंद्रात रूजु झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या काळात पीस पार्क उद्यानाचे रु पडे पालटले.कमीत कमी संसाधनांमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ असे लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींसाठी व्यायाम मनोरंजनाची साधने उपलब्ध करु न दिली.स्वच्छता अभियानाची प्रभावीपणे अंमल बजावणी करु न प्लास्टिकमुक्त केंद्र व रहिवासी वसाहत, शुन्य कचरा प्रकल्प अभियान राबविले. सुका कचरा व ओला कचरा वेगळा करु न योग्य व्यवस्थापण करण्यासाठी सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले.ओला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी घरच्या घरी खत बनविणारे मॅजिक बॉक्स वापरण्यापाठी कर्मचारी व रहिवाशांना प्रोत्साहित केले.प्लास्टिकमुक्त अभियानासाठी प्लास्टिकला पर्याय म्हणुन कापडी पिशव्या बनवुन मोफत वितरीत केल्या.कापडी पिशव्या बनविण्यासाठी जुने कपडे, साड्या संकलन केंद्र उभारले.त्याचबरोबर इ-वेस्ट संकलन केंद्रही उभारले.हे सर्व करत असतांना एकलहरे वीज केंद्र हे शुन्य गळती केंद्र म्हणुन उपाययोजना सुरु केली.पाणी, कोळसा, आॅईल, वाफ, हवा, सांडपाणी यांची गळती शुन्य करण्याचे ध्येय ठेऊन काम केले.प्रश्न : आपल्या कार्याची दखल विविध स्ततरावर कशी घेतली गेली?निखारे: २०१७-१८ मध्ये महानिर्मिती मध्ये नाशिक औष्णिक विद्युत केंद्राला उत्कृष्ट तांत्रिक कामिगरी बद्दल द्वितीय क्र मांक पटकावला तर स्वच्छता अभियानात प्रथम क्र मांकावर राहून महानिर्मितीचे रोल मॉडेल ठरले आहे. महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ आयोजित पर्यावरण विषयक वसुंधरा लघु चित्रपट स्पर्धा २०१९ या स्पर्धेत नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचा लाईफलाईन मिटस् लाईफ या लघु चित्रपटाला हौशी गटात प्रथम क्र मांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व मुख्य अभियंता म्हणून मला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख रु पयांचा धनादेश स्वरु पात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.मुलाखत: शरदचंद्र खैरनार 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentपर्यावरणforestजंगल