शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:01 IST

नाशिक : सततच्या पावसाच्या सोबतीलाच अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहारगृहे, खानावळी सुरु झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमागणीत वाढ : अतिवृष्टीचा परिणाम, नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर

नाशिक : सततच्या पावसाच्या सोबतीलाच अतिवृष्टीमुळे खरिपाच्या कांद्याचे झालेले अतोनात नुकसान तर,दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला होत असलेली वाढती मागणी त्यातच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सर्वत्र उपहारगृहे, खानावळी सुरु झाल्याने सध्या कांद्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत कांदा ‘भाव’ खाणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नविन कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी सततचा पावसाबरोबरच परतीच्या मुसळधारेचा फटका कांद्याला बसल्यामुळे यंदा नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून डिसेंबर नंतरच नविन कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे .तोपर्यंत चांगल्या प्रतिच्या जुन्या कांद्याचे भाव वाढतच राहणार असून ही दरवाढ आणखीन महिनाभर तरी टिकून राहील असे जाणकार व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा कांद्याच्या उत्पादनाचे समिकरण विस्कटले आहे. साठवण केलेला उन्हाळी कांदा लॉकडाऊनच्या काळात सुरूवातीला माती मोल दरात विकणाºया कांदा उत्पादकांना गत महिन्यापासून बाजारात चांगल्या दराने विकण्याची वेळ आली असता,केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. याच साठवण केलेल्या कांद्यातील ७० टक्के कांदा वातावरण बदल तसेच पावसामुळे सडला. उवर्रीत कांद्यावर वर्षभराचे गणित जमवणाºया कांदा उत्पादकांचे गणित निर्यात बंदी मुळे विस्कटलेले आहे.अतिवृष्टी मुळे पावसाळ्यात लावलेली कांद्याची रोपे देखील तगू शकली नाही.परिणामी कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे काही काळ कांदा भाव खाणारच असे चित्र आहे.हॉटेल्स सुरू झाल्याने दरवाढकळवण कृषि उत्पन्न समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गत आठवडयात कांद्याचा क्विंटल दर सरासरी तीन हजार ५०० ते चार हजार २०० रुपये होता. परंतु सोमवारी (दि.१९) बाजारात अंदाजे ४५०० क्विंटल आवक झाली असता कांद्याला कमाल ८ हजार ८००, किमान दोन हजार ५०० तर सरासरी सहा हजार ५०० रुपये भाव मिळाला. मंगळवारी (दि.२०) बाजारात अंदाजे ३००० क्विंटल आवक होऊन कमाल ९ हजार ७०० ते आठ हजार ५०० ,किमान चार हजार ९१० ते दोन हजार ७०० तर सरासरी सात हजार ५०० ते सहा हजार ५०० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला. बुधवारी (दि. २१ बाजारात अंदाजे ३५०० क्विंटल आवक होऊन कमाल नऊ हजार २०० तर किमान ४ हजार ५२० ते दोन हजार तर सरासरी सात हजार ते सहा हजार रूपये असा भाव मिळाला. उपहारगृहे, खानावळी सुरू झाल्याने कांदा मागणीत एकदम झालेली वाढ हेच कांदा दरवाढीमागचे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड