‘भुईकोट’ला अतिक्रमणाचा वेढा
By Admin | Updated: December 31, 2016 23:08 IST2016-12-31T23:07:55+5:302016-12-31T23:08:14+5:30
आम्ही मालेगावकर समिती : गतवैभव प्राप्त करून द्या

‘भुईकोट’ला अतिक्रमणाचा वेढा
मालेगाव : येथील भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या भुईकोट किल्ल्याच्या देखभालीकडे शासन, पुरातत्व विभाग व महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. किल्ल्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असले तरीही इतिहासाची साक्ष सांगणारा कुठलाही फलक परिसरात नाही व संरक्षणासाठी चौकीदारही नाही. किल्ल्याच्या चारही बाजूंना मजबूत तटबंदी व बुरुज आहेत. या बुरुजावरच अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली आहेत. चारही बाजूंनी असलेले खंदक माती टाकून त्यावरही अतिक्रमण केले आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील पिढीस इतिहासाचे पुरावे सापडणार नाहीत. बुरुजांची व तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी, किल्ल्याच्या आजूबाजूच्या खदकांमधील माती काढून खंदक पूर्ववत करावेत, किल्ल्यामध्ये विविध ठिकाणी इतिहासाची माहिती देणारे फलक लावावेत, किल्ल्याच्या आजूबाजूचे अतिक्रमणे कोणताही राजकीय मुलाहिजा न बाळगता जमीनदोस्त करावे. तसेच किल्ल्यास राज्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित करावे, पर्यटन विकासासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात आदि मागण्या आम्ही मालेगावकर समितीने केल्या आहेत. यावेळी निखिल पवार, रविराज सोनार, यू. आर. पाटील, देवा पाटील, राकेश डिडवानिया, देवेंद्र अलई, अविनाश निकम, अॅड. परीक्षित बच्छाव, दादा बहिरम, सलाम कुरेशी, विवेक वारुळे, दीपक पाटील, प्रदीप पहाडे, बाळा भुसे, संजय सोनजे, अतुल लोढा, गणेश जंगम, एम. डी. चव्हाण, रूपेश अहिरराव, कलीम अब्दुल्ला, आप्पाजी महाले, विजय निकम, करण माळी, अनिल कोतवाल, शत्रुघ्न गवळी, आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)