शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:04 IST

महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.

ठळक मुद्देसायखेडा, दिंडोरी व वडेल येथे जाहीर सभा

सायखेडा/दिंडोरी/मालेगाव : महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.महायुतीने राज्यात काम केले असून, जनता त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडणार आहे, असा विश्वास व्यक्त करून ठाकरे यांनी महायुतीने दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केल्याचे सांगितले. महायुतीचे सरकार महाराष्टÑामध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येणार असून, निफाड तालुक्यात खऱ्या अर्थाने अनिल कदम यांनी विकासाचे मॉडेल उभारलेले असल्याने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तालुक्याला त्यांच्या रूपाने मानाचे स्थान मिळणार असल्याची ग्वाही-देखील ठाकरे यांनी सायखेडा येथील सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार भारती पवार आदी उपस्थित होते. (पान ४ वर)यावेळी बाळासाहेब क्षीरसागर ,दीपक शिरसाट, सुधीर कराड, अनिल कुंदे,शिवनाथ कडभाने, उत्तम गडाख, कमल राजोळे, भास्कर बनकर, उदय सांगळे, जगन कुटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील वडेल येथे बोलताना प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असून विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी गाव ते शाळा-महाविद्यालयापर्यंत बस सेवा सुरू केली जाईल व डिजीटल शिक्षण मुंबईसह इतर शहरी भागापुरते मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजीटल शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, उमेदवार दादा भुसे, सुनील गायकवाड, बंडूकाका बच्छाव, सुनील देवरे आदी उपस्थित होते.दिंडोरी येथे बोलताना नवा महाराष्ट्र उभारणीसाठी आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उमेदवार भास्कर गावित, रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाप्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते.नांदूरमधमेश्वरला नवीन धरण बांधणारसावरगाव परिसरात पंचतारांकित वसाहत उभारण्यासोबतच भविष्यात नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन धरण बांधण्याचा आपला मानस असल्याचे सायखेडा येथील सभेत आमदार अनिल कदम यांनी सांगितले. निफाड तालुक्यात विविध विकासाचे शिल्प आपण उभे केले असून, रस्त्यांचे जाळे विणले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी सातत्याने पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याने मतदार यंदाही आपल्यालाच संधी देतील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे