शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:04 IST

महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.

ठळक मुद्देसायखेडा, दिंडोरी व वडेल येथे जाहीर सभा

सायखेडा/दिंडोरी/मालेगाव : महिलांना मानाचे स्थान देण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये केले.महायुतीने राज्यात काम केले असून, जनता त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे विरोधकांचा धुव्वा उडणार आहे, असा विश्वास व्यक्त करून ठाकरे यांनी महायुतीने दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केल्याचे सांगितले. महायुतीचे सरकार महाराष्टÑामध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येणार असून, निफाड तालुक्यात खऱ्या अर्थाने अनिल कदम यांनी विकासाचे मॉडेल उभारलेले असल्याने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तालुक्याला त्यांच्या रूपाने मानाचे स्थान मिळणार असल्याची ग्वाही-देखील ठाकरे यांनी सायखेडा येथील सभेत बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार भारती पवार आदी उपस्थित होते. (पान ४ वर)यावेळी बाळासाहेब क्षीरसागर ,दीपक शिरसाट, सुधीर कराड, अनिल कुंदे,शिवनाथ कडभाने, उत्तम गडाख, कमल राजोळे, भास्कर बनकर, उदय सांगळे, जगन कुटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील वडेल येथे बोलताना प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करणार असून विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी गाव ते शाळा-महाविद्यालयापर्यंत बस सेवा सुरू केली जाईल व डिजीटल शिक्षण मुंबईसह इतर शहरी भागापुरते मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजीटल शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, उमेदवार दादा भुसे, सुनील गायकवाड, बंडूकाका बच्छाव, सुनील देवरे आदी उपस्थित होते.दिंडोरी येथे बोलताना नवा महाराष्ट्र उभारणीसाठी आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उमेदवार भास्कर गावित, रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाप्रमुख सुनील पाटील आदी उपस्थित होते.नांदूरमधमेश्वरला नवीन धरण बांधणारसावरगाव परिसरात पंचतारांकित वसाहत उभारण्यासोबतच भविष्यात नांदूरमधमेश्वर धरणावर नवीन धरण बांधण्याचा आपला मानस असल्याचे सायखेडा येथील सभेत आमदार अनिल कदम यांनी सांगितले. निफाड तालुक्यात विविध विकासाचे शिल्प आपण उभे केले असून, रस्त्यांचे जाळे विणले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी सातत्याने पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याने मतदार यंदाही आपल्यालाच संधी देतील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे