शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांना डांबले मंदिरात

By admin | Updated: August 23, 2015 00:16 IST

‘कडवा’चे पाणी पेटले : आवर्तन सोडून तीन आठवडे झाले तरी पाणी मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

सिन्नर : कडवा कालव्यास आवर्तन सोडून तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सिन्नरच्या पूर्वभागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या तीन कर्मचाऱ्यांना सुमारे साडेतीन तास मंदिरात डांबून ठेवल्याची घटना धनगरवाडी येथे घडली. आमदार राजाभाऊ वाजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांची समजूत काढत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वाजे यांच्या मध्यस्थीनंतर तीन दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्याचे उपविभागीय अभियंत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे साडेतीन तासानंतर कडवाच्या पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांची मंदिरातून सुटका करण्यात आली. कडवा कालव्यास ३१ जुलै रोजी म्हणजे सुमारे २३ दिवसांपूर्वी ३२५ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. तीन आठवडे उलटल्यानंतरही सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात शेवटच्या टोकापर्यंत अद्याप पाणी पोहचलेले नाही. साधारणत: पंधरा दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचणे अपेक्षित होते. मात्र पाटंबधारे खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप धनगरवाडी, निमगाव-देवपूर, पंचाळे, शिंदेवाडी, उजनी, रामपूर व खडांगळी येथील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पाणी पोहचण्यास विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पाण्याचे आवर्तन ४५ दिवस राहणार असले तरी निम्मे दिवस उलटून गेल्यानंतरही पाणी केवळ ७८ किलोमीटरपर्यंत पोहचल्याने शेतकरी संतप्त झाले. शेवटच्या ८८ किलोमीटरपर्यंतच्या टोकापर्यंत पाणी पोहचण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कडवा कालव्याचे शाखा अभियंता बी.एस. कटके, कालवा निरीक्षक बी.एस. सोळसे, मोजणीदार बी.एम. शिंदे धनगरवाडी येथे आले. संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना अद्याप पाणी धनगरवाडीपर्यंत का पोहचले नाही याचा जाब विचारण्यास प्रारंभ केला. पाण्याची चोरी रोखण्यास कर्मचारी असमर्थ असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी केला. पाणी चोरीस पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप यावेळी शेतकऱ्यांनी करीत या तिघा कर्मचाऱ्यांना धनगरवाडी येथील मारुती मंदिरात डांबून टाकण्यात आले.मंदिरात डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अभियंता प्रशांत सगभोर यांच्यासोबत भ्रमणध्वनीहून संपर्क साधून आपल्याला शेतकऱ्यांनी डांबून ठेवले असल्याची माहिती दिली. सगभोर यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धनगरवाडी येथे धाव घेतली. संतप्त शेतकऱ्यांनी पाणीचोरी होत असल्यानेच पाणी पोहचत नसल्याची तक्रार यावेळी केली.काही शेतकऱ्यांनी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत संपर्क साधून पाटबंधारे खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंदिरात डांबले असल्याची माहिती दिल्यानंतर वाजे यांनी तातडीने धनगरवाडी येथे धाव घेतली. वाजे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून सगभोर यांच्यासोबत चर्चा केली. सुमारे तासभर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचल्यानंतर सगभोर यांनी तीन दिवसात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्याचे आश्वासन दिले. वाजे यांच्या मध्यस्थीनंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास शाखा अभियंता, कालवा निरीक्षक व मोजणीदार या तीन कर्मचाऱ्यांची मंदिरातून सुटका करण्यात आली. यावेळी खंडेराव डुंबरे, अशोक गायकवाड, अशोक हांडोरे, अण्णा डुंबरे, वाल्मीक हांडोरे, कैलास डुंबरे, शिवाजी तळेकर, रेवळनाथ थोरात, बाळू सोनवणे, गोरख सोनवणे, संदीप डुंबरे, शिवाजी घुले, सुभाष शिंदे, राधाकिसन डुंबरे, गोवर्धन शिंदे, बाळा देवगिरे, बाबासाहेब डुंबरे, दिलीप डुंबरे, साहेबराव डुंबरे, राजेंद्र संबेराव, हरिष डुंबरे, शंकर डुंबरे, भाऊसाहेब डुंबरे, ज्ञानदेव डुंबरे, शरद डुंबरे यांच्यासह धनगरवाडी, उजनी, शिंदेवाडी, पंचाळे येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)