शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:50 IST

नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न ...

ठळक मुद्देपक्ष, संघटनेचे बॅनर बाजुला : २ जानेवारीला राज्यभर सत्याग्रहराज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह

नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न येता, निव्वळ भुजबळ समर्थम म्हणवून घेणा-या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने येत्या २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील संदेश सोशल मिडीयावर बुधवारी सका ळपासून व्हायरल केला जात असून, त्या संदेशाखाली कोणाही व्यक्ती, पक्ष, संघटनेचे नाव नसून फक्त भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनी तो झपाट्याने पसरवला आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खाते तसेच अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला असून, गेल्या २१ महिन्यांपासून भुजबळ तुरूंगात आहेत. त्यांच्या विरोधातील तपास पुर्ण होऊन मालमत्ताही जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे कलम ४५ अवैध ठरविल्याने भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात करण्यात आलेला अर्ज अलिकडेच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सरकार भुजबळ यांना सुडबुद्धीने तुरूंगात अडकवून ठेवत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होऊन गेल्या चार दिवसांपासून समर्थक कार्यकर्ते एकत्र येवून सरकारविरोधात रोष व्यक्त करू लागले आहेत. मोर्चा, निदर्शने, धरणे, रास्तारोको अशा प्रकारचे आंदोलने करण्याची तयारी राज्यभर सुरू झाल्याने तसे करण्यापेक्षा संपुर्ण राज्यात एकाच प्रकारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे असाही मतप्रवाह पुढे आला व त्यातुन २ जानेवारी रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात कोणताही पक्ष, समाज, धर्म, संघटना व संस्थांच्या बॅनर्स, पोस्टर्सना दूर ठेवण्यात आले असून, निव्वळ भुजबळ समर्थक अशा एकच ओळखीतून सर्व जमणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक