शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भुजबळ समर्थकांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:50 IST

नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न ...

ठळक मुद्देपक्ष, संघटनेचे बॅनर बाजुला : २ जानेवारीला राज्यभर सत्याग्रहराज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह

नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार विरोधात रोष निर्माण झालेला असून, तो व्यक्त करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेस, समता परिषद वा तत्सम संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र न येता, निव्वळ भुजबळ समर्थम म्हणवून घेणा-या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गांधीमार्गाने येत्या २ जानेवारी रोजी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील संदेश सोशल मिडीयावर बुधवारी सका ळपासून व्हायरल केला जात असून, त्या संदेशाखाली कोणाही व्यक्ती, पक्ष, संघटनेचे नाव नसून फक्त भुजबळ समर्थक म्हणवून घेणाºयांनी तो झपाट्याने पसरवला आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खाते तसेच अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला असून, गेल्या २१ महिन्यांपासून भुजबळ तुरूंगात आहेत. त्यांच्या विरोधातील तपास पुर्ण होऊन मालमत्ताही जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे कलम ४५ अवैध ठरविल्याने भुजबळ यांना जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात करण्यात आलेला अर्ज अलिकडेच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सरकार भुजबळ यांना सुडबुद्धीने तुरूंगात अडकवून ठेवत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होऊन गेल्या चार दिवसांपासून समर्थक कार्यकर्ते एकत्र येवून सरकारविरोधात रोष व्यक्त करू लागले आहेत. मोर्चा, निदर्शने, धरणे, रास्तारोको अशा प्रकारचे आंदोलने करण्याची तयारी राज्यभर सुरू झाल्याने तसे करण्यापेक्षा संपुर्ण राज्यात एकाच प्रकारचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात यावे असाही मतप्रवाह पुढे आला व त्यातुन २ जानेवारी रोजी संपुर्ण राज्यात एकाच वेळी दिवसभर तहसिल कार्यालयासमोर सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात कोणताही पक्ष, समाज, धर्म, संघटना व संस्थांच्या बॅनर्स, पोस्टर्सना दूर ठेवण्यात आले असून, निव्वळ भुजबळ समर्थक अशा एकच ओळखीतून सर्व जमणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक