शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

वीजमंडळाचा भोंगळ कारभार, मजुराचे वीज बिल ६९ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा झटका : महिनाभरापासून कुटुंब अंधारात

पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार थांबत नसून अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे काम अजूनही सुरू आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाला चक्क ६९ हजारांचे वीज बिल दिल्यामुळे पुन्हा एकदा महावितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत संतोष जाधव हे वास्तव्यास असून ते कांद्याच्या खळ्यावर प्रतिदिन २०० रुपये रोजंदारीने काम करतात. त्याच्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वीज बिल आई पार्वतीबाई जाधव यांच्या नावाने असून त्यांच्या घरात एक ट्यूबलाइट, टीव्ही व पंखा या व्यतिरिक्त विजेचे कोणतेच उपकरण ते वापरत नाहीत. असे असताना महावितरण कंपनीने मार्चमध्ये तब्बल ६९ हजारांचे बिल पाठवून त्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे एवढे बिल आले कसे असा प्रश्न जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता वीज बिल भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. थकलेली रक्कम न दिल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा महिनाभरापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जाधव कुटुंब अंधारात असून मेणबत्तीच्या उजेडात ते राहत आहेत. त्यामुळे खंडित केलेले वीज कनेक्शन लवकर जोडून द्यावे व अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले वीज बिल रद्द करून नव्याने योग्य बिलाची आकारणी करावी, अशी मागणी जाधव परिवाराने केली आहे.सदर कुटुंबाला शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी भेट देऊन अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले बिल महावितरण कंपनीने रद्द करावे अन्यथा महावितरणला शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे.पूर्वी दर महिन्याला सहाशे ते सातशे रुपये वीज बिल यायचे पण फेब्रुवारीत अचानक ६२ हजार रुपये बिल आले. ते न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा बंद असतानाही त्या ६२ हजारात सात हजारांची भर टाकून पुन्हा मार्चमध्ये ६९ हजारांचे बिल आले. मागील लॉकडाऊनमुळे अगोदरच उत्पन्न घटले असताना अव्वाच्या सव्वा वीज बिल भरायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.- संतोष जाधव, वीज ग्राहक, पिंपळगावज्या वीज ग्राहकांची तक्रार असेल त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. त्यांच्या तक्रारीचे योग्य निवारण करण्यासाठी सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करुन विभागाकडून त्यांना योग्य न्याय दिला जाईल.- नितीन पगारे, सहायक अभियंता, महावितरण.

टॅग्स :electricityवीजGovernmentसरकार