शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे तळ्यात मळ्यात, भाजपही संभ्रमात; निवडणुकीनंतर युती होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:25 IST

नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढवल्या आहेत. मात्र, २०१७ मध्ये मनसेच्या ४० वरून अवघ्या पाच जागा आल्याने ...

नाशिक महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्व निवडणुका मनसेने स्वबळावर लढवल्या आहेत. मात्र, २०१७ मध्ये मनसेच्या ४० वरून अवघ्या पाच जागा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. नाशिक महापालिकेत मनसेने २००७ मध्ये प्रथम निवडणूक लढवली तेव्हा १२ नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर थेट सत्ताच मिळाली असली तरी दोन्ही वेळी मनसेने स्वबळावरच निवडणुका लढवल्या होत्या. २०१७ मध्ये पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली आणि पाच नगरसेवकच निवडून आले. २०१७ मध्ये राज्यात भाजपा आणि शिवसेना सत्तेवर असल्याने दोन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळाल्याच; परंतु भाजपाला तर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमत मिळाले. परंतु आता त्यातही राज्यातील सत्तांतर भाजपाच्या अडचणीचे कारण आहे.

पाच वर्षातील गटबाजी तसेच नवे जुने वाद आणि महत्त्वाचे राज्यातील सत्तांतर यामुळे भाजपाला मेाठे आव्हान आहे. तर मनसेची अवस्था आधीच बिकट त्यात बहुसदस्यीय प्रभाग यामुळे या पक्षालाही निवडणूक सोपी नाही. साहजिकच महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप- मनसे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे. दोन महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील नाशिक दौऱ्यावर आले आणि त्यांची भेटदेखील झाली. तेेव्हापासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा वाढल्या आहेत. मध्यंतरी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या सोमवारी (दि. ६) राज ठाकरे नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यांचे मत अजमावत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे आलेच नाहीत. त्यांच्या ऐवजी केवळ मनसे नेते संदीप देशपांडे हेच आले आणि त्यांनी युतीचा कोणताही विषय सध्या नाही. मनसे स्वबळावरच लढणार असल्याचे सांंगितले. त्यामुळे युतीचा सस्पेन्स कायम आहे.

भाजपचा फायदा नाही?

नाशिकमध्ये युती केल्यास भाजपाला मनसेकडून फार फायदा होणार नाही असे भाजप नेत्यांचे म्हणणे असून त्यांनी ते पक्षश्रेष्ठींपर्यंत कळवले आहे. भाजपने शंभर प्लस मिशन आहे. अशावेळी मनसेला जागा सोडल्यास भाजपाचे मिशन अडचणीत येऊ शकते. याशिवाय मनसेचे विद्ममान नगरसेवक असलेल्या ठिकाणी भाजपाची तर भाजपाच्या विद्ममान नगरसेवकांच्या जागा मागितल्यातर अडचणीदेखील होऊ शकतात. त्यामुळे गोंधळ वाढू शकतो.

निवडणुकीनंतरच युती शक्य

निवडणूकपूर्व युती करून गोंधळ वाढवून घेण्याच्या ऐवजी निवडणुकीनंतर भाजप-मनसे युती शक्य आहे. २०१२ निवडणुकीत मनसेला बहुमत नसताना भाजपाने पाठबळ दिले होते. आताही निवडणुकीनंतरच गरज भासल्यास युती होऊ शकते.

भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. सध्या तरी नाशिक महापालिकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मनसेने तयारी केली आहे.

- संदीप देशपांडे, नेता मनसे

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण