शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

By नामदेव भोर | Updated: May 23, 2023 15:21 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवार पूल परीसरातील मुंबई आग्रा महामार्ग उड्डानपुलावर झालेल्या अपघातात एक सात वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डान पुलावर मंगळवारी (दि.२३) सकाळी द्वारका ते आडगाव दरम्यानच्या कन्नमवार पुलावर आयशर ट्रक व कंटेनरमध्ये या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर कंटेनरचा आणि आयशर ट्रकचे चालक या अपघातात जखमी झाला असून एका आठ वर्षाच्या मुलीचाही जखमींमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नमवार पूल परीसरातील मुंबई आग्रा महामार्ग उड्डानपुलावर झालेल्या अपघातात एक सात वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात वर्षाची तरनुम अफजल शेख व तिची आई नफिसा अफजल शेख (२९) यांचा सामावेश असून कंटेनर चालक मोहम्मद ताहिर कुदरतअली शेख व आयशर चालक अफजल शेख यांच्यासह एक ८वर्षाची मुलगी आयशा शेख जखमी झाली आहे. या अपघातातील रुग्णांना औषधोपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नाशिक शहरात अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या असून रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. अशातच नाशिक मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली असून यात मायलेकींचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPoliceपोलिस