शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:57 AM

गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार असला तरी आता पाणी पावसाने ओढ दिल्याने आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपात अटळ असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे. दरम्यान, महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी शनिवारी (दि.२२) धरणाची पाहणी करणार आहेत.  गंगापूर धरणातून महापालिकेसाठी आरक्षित पाणी मिळत असले तरी त्यानंतर त्यात गौतमी, गोदावरी आणि कश्यपी धरणाचे पाणी सोडते. यंदा हे पाणी अखेरच्या चरणात अर्धवट स्थितीत सोडून जलसंपदा विभागाने अडचण केली आहे. गंगापूर धरणातील साठ्या व्यतिरिक्तकश्यपी या साठवण धरणात सध्या ९० दशलक्षघनफूट, तर गौतमी गोदावरी धरणात ६० दशलक्षघनफूट पाणी आहे. धरणातून हे पाणी सोडले तरी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून ते मध्ये येत असून, बाष्पीभवनामुळे हे पाणी कमी होईल. याशिवाय ते आल्यानंतर त्याची पातळी कमी असेल तर याच ठिकाणी असलेल्या खडकामुळे ते पाणी धरणाच्या जलविहिरीत पोहोचणार नाही, अशी भीती आहे. गेल्या वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या शिरोभागाच्या कामाच्या वेळीच हा खडक हटवून धरणातील निन्म पातळीवरील पाणी जलवाहिरीत आणण्याचे काम करणे बंधनकारक होते मात्र अद्याप हे काम झालेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील पालिकेला वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे.आता शहरात पाणीबाणी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: पावसाने ओढ दिल्याने पाणी कितपत पुरेल याविषयी शंका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले चर खोदण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.तर पाणी कपात अटळगंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू असले तरी मूळ खडक हटविण्याचे काम न झाल्याने दीडशे एमसीएफटी पाणी मिळणे अडचणीचे झाले आहे, तर दुसरीकडे चेहेडी बंधाºयाच्या जवळ मलयुक्त आणि अळ्या असलेले पाणी असल्याने पाणी उपसा बंद करण्यात आल्याने दारणा धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी आरक्षित असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यातच पावसाने ओढ दिली असल्याने आणखी पाच-दिवस पाऊस न झाल्यास पाणी कपात अटळ असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.दारणातून आवर्तन सोडण्यासाठी गमे यांचे पत्रदारणा धरणातून महापालिकेला ३०० दशलक्षघनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. चेहेडी येथे बंधारा बांधून तेथून महापालिका पाणी घेत असली तरी बंधाºयाच्या वरील बाजूस भगूर नगरपालिका आणि कॅण्टोमेंट बोर्डाचे मलयुक्त पाणी येत असून त्यामुळे महापालिकेला शुद्धीकरणात अडचणी येत असल्याने २२ मेपासून येथून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या पाण्याची गरज लक्षात घेता दारणा धरणातून पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने चेहेडी बंधाºयाच्या पुढील बाजूस जेथून मलयुक्त पाणी येते त्याच्या पलीकडे जाऊन बंधारा बांधणे किंवा पाइपलाइन टाकून पाणी चेहेडी बंधाºयात आणणे असे दोन प्रस्ताव होते. त्यापैकी नवीन बंधारा बांधण्याबाबत महापालिका विचार करीत आहे, असे गमे यांनी सांगितले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी