शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठासाठी प्रयत्न, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशकात घोषणा

By suyog.joshi | Updated: February 1, 2025 18:16 IST

तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.

नाशिक (सुयोग जोशी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. नवनवीन व प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, माझी शेतकऱ्यांशी नाळ जोडली असून येत्या काळात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (दि. १) केली.तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेते उपस्थित हाेते. यावेळी बोलतांना कोकाटे म्हणाले, देशातील ५० टक्के नागरिक हे शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होतांना दिसत आहेत. शेतीतील नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून नवीन विकसित वाण, पीकपद्धती विकसित होत आहेत. या शेती उत्पादितांना त्यांच्या गाव, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री व्यवस्था व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पणन मंत्री यांच्यासमवेत चर्चा करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.सेंद्रिय उत्पादने वाढविण्याची गरजसेंद्रिय उत्पादने वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनीप्रयत्न केले पाहिजे. चांगल्या प्रकारचे अन्नधान्य पिकविले तरच आरोग्याला फायदा होईल. अन्यथा आपल्याला कॅन्सरसारख्या रोगाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे खाण्याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला कोकाटे यांनी दिला. तृणधान्यांमधील पोषणूमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे. हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढविणे आवश्यक असल्याचेही सांगितले.मंत्रालयात सोमवारी बैठकशेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने मंत्रालयात सोमवारी (दि. ३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत बैठकीचे आयाेजन करण्यात आल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र