शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 8:41 PM

दिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत.

ठळक मुद्देअपघाताना निमंत्रण : दिंडोरी तालुक्यातील वाहनधारकांची डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत.दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत वाढ झाली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढल्याने डोकेदुखी वाढली आहे. लखमापूर ते म्हेळुस्के हा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. या रस्त्यावर कादवा नदीवरील पूल येत असल्यामुळे त्या पुलांवरून पावसाळ्यात प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. लखमापूर फाटा ते करजंवण फाटा हा रस्ता औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. परंतु या रस्त्याच्या साइडपट्ट्याचे काम अर्धवट आहे.या रस्त्यावर सध्या खड्ड्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. म्हेळुस्के फाटा ते कादवा म्हाळुंगी, म्हाळुंगी ते पाडे या रस्त्यांची स्थिती सध्या खडतर बनली आहे. दहेगाव फाटा ते वागळूद, वागळूद ते फोफशीगाव, दहिवी ते माळे तसेच आक्र ाळे ते एचएएल गेट जानोरीपर्यंत, दिंडोरी ते कोराटे, मोहाडी ते अंबे (जानोरी) खेडगाव ते शिंदवड, बोपेगाव ते खेडगाव फाटा, बोपेगाव (कावळेवाडी फाटा) ते सोनजांब, मावडी ते मावडी फाटा, वलखेड फाटा ते ननाशी हा रस्ता मागील कित्येक वर्षांपासून खड्ड्यांचे दु:ख भोगत आहे.पहिल्याच पावसात खड्ड्यातगतवर्षी वरखेडा ते कादवा कारखाना, दिंडोरी पालखेड, पिंपळगाव आदी रस्त्यांचे कोट्यवधी खर्च करून नूतनीकरण झाले. मात्र यातील काही भागाचे डांबरीकरण वरील शेवटचे सिलकोट करणे पावसाळ्यापूर्वी करणे बाकी राहिले अन् पाऊस सुरू होताच रस्ता खराब होत खड्ड्यात रूपांतरित झाला.वलखेड ते पाडे हा रस्ताही खराब झाला. बांधकाम विभागाने रस्ते संबंधित ठेकेदारांकडून दुरु स्त केले जातील, असे वारंवार सांगितले मात्र दुरु स्तीस अद्यापही मुहूर्त लागलेला नाही.ठेकेदारांची मनमानी, शेतमालाची नासाडीतालुक्यात एका ठेकेदार कंपनीने विविध कामे घेतली आहेत; मात्र ती वेळेत पूर्ण केली नसून गुणवत्ता राखलेली नसल्याचा आरोप वाहन-धारकांनी केला आहे. वरखेडा-खेडगाव-शिंदवड रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार कामही करत नाही अन् काम सोडतही नाही. त्यास लाखोंचा दंड केल्याचे बांधकाम विभाग सांगत लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन देत आहे. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तसेच खराब रस्त्यामुळे शेतकरीवर्गाला पिकविलेला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी विलंब होतो. परिणामी कवडीमोल भावाने माल विकावा लागतो.रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकजण जखमी तर काही ना प्राणाला मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत, तर खड्ड्यांमधून मार्गक्रमण करताना वाहनांचे पाटर््सही तुटल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सध्या तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ते एक प्रकारे तालुक्याच्या ग्रीन झोनला अथवा औद्योगिक क्षेत्राला या रस्त्यामुळे ग्रहण लागले आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस