शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:58 PM

गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.

येवला : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.पावसाअभावी तालुक्यातील सुकण्यास, करपण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील संपूर्ण भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या साडेतीन एकर सोयाबीन पिकात पावसाअभावी नांगर फिरवला होता. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोटमगाव परिसरात साठ ते सत्तर टक्के शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. येथील मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मानोरी येथील एक-दोन शेतकºयांनी मका पिकावर नांगर फिरवला होता. परंतु १६ आॅगस्टला झालेल्या पावसाने येवला तालुक्यावरील दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शेतकरी पुन्हा मशागतीची कामे करताना दिसत आहे. मका व सोयाबीनला युरिया टाकताना दिसत आहे. या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील सुकलेली पिके हिरवीगार दिसत आहे. या पावसाने काही दिवसापुरते पिकांना जीवदान दिले असून, काही भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.शेतातील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत.येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कार्यान्वित असलेली ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर विदारक चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बºयापैकी पडलेल्या पावसाने पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून पश्चिम भागातील गोई नदीला पाणी सोडण्यात यावे तसेच वितरिका नंबर २१,२५ आणि २८ ला या आवर्तनातून चाºयांना पाणी सोडावे. या वितरिका आणि बंधारे भरल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याने या वितरिका आणि बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पिके झाली हिरवीगारदीड महिन्यापासून शेतात जावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरु वातीच्या पावसाने उतरलेली खरीप पिके दीड महिन्यापासून पाण्याविना सुकल्याने करपू लागली होती. परंतु या थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप पिके हिरवीगार झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक