शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

वाढत्या उन्हामुळे विल्होळीला बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:59 IST

वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

विल्होळी : वाढत्या उन्हामुळे व पाण्याच्या अतिवापरामुळे यंदा प्रथमच गावाला पाणीपुरवठा करणारा विल्होळी बंधारा आटला असून, पंधरा दिवसांत पाऊस न आल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. विल्होळी व परिसरात पाणीपुरवठा करणारे विल्होळी बंधाऱ्यातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागल्याने ग्रामपंचायतीस आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीची वेळ आली असून, बंधाºयावर बसविण्यात आलेले कृषिपंप तत्काळ काढून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.विल्होळी व परिसराला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाºया विल्होळी बंधाºयाची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली असून, उष्णतेचे वाढलेले तापमान व त्यातच या बंधाºयातून वारेमाप होणारा उपसा पाहता, आगामी पंधरा दिवसांपुरताच पाणी साठा पुरण्याची चिन्हे आहेत.या बंधाºयातून शेतीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जातो. त्यामुळे हा उपसा असाच सुरू राहिल्यास बंधारा कोरडाठाक पडेल. त्याला पर्याय म्हणून पाणीपुरवठ्याची कोणतीही सोय वा व्यवस्था नसून तसे झाल्यास विल्होळीकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या बंधाºयातून पाणी घेणाºया शेतकऱ्यांनी आपले कृषिपंप ताबडतोब काढून घ्यावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. त्याला काही शेतकºयांनी तत्काळ प्रतिसादही दिला असून, अनेकांनी ते काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.शेतक-यांची चारा छावणीची मागणीसध्याच्या वाढत्या उन्हामुळे जनावरांना मुबलक चारा, पाणी मिळत नसल्याने दररोज १२ ते १५ लिटर दूध देणारी जनावरे पाच ते सहा लिटरवर आल्याने दुधाच्या भावामध्ये वाढ झाली आहे. काही जनावरे धरणांमध्ये पाणी मिळत नसल्याने धोका पत्करून दलदलीसारख्या भागात उतरून पाण्याचा शोध घेत असल्याचे चित्र आहे. विल्होळी व परिसर हा नाशिक शहराच्या लगत असल्याने या ठिकाणी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. उन्हाच्या दाहकतेने परिसरात चाºयाची कमतरता भासत असल्यामुळे शेतकºयांनी चारा छावणीची मागणी केली आहे.विल्होळी बंधाºयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठा करणाºया विहिरीस पाणी येत नाही. नाइलाजास्तव दिवसाआड पाणी सोडावे लागते, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा गैरवापर न करता पाणी जपून वापरावे. बंधाºयावर लावलेले कृषिपंप काढून घ्यावे, अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने सदर कृषिपंप जप्त केले जातील.- बाजीराव गायकवाड, सरपंच

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण