शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पाऊस उघडल्याने बळीराजांची कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 4:35 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देलखमापूर : पिकांतील तण ठरतेय बळीराजांची डोकेदुखी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजांची इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे.दिंडोरी तालुक्यात संततधार होणारा पाऊस यामुळे शेतकरी वर्गाचे बरीच कामे बाकी होती. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील इतर कामे करण्यासाठी बळीराजांची लगीन घाई सुरू झाली आहे. त्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणावर झाल्याने ते काढण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ होत आहे. सततधार पावसामुळे तण काढण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसून येत आहे.टमाटा पिकामधील तण, सोयाबीन आदी पिकांमधील तण काढण्यासाठी शेतकरी वर्गाला मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. संततधार पावसाने रिपरिप झाल्याने मजुर वर्ग मिळणे कठीण होऊन बसले आहे. जरी मजुर वर्ग उपलब्ध झाला तर मजुरीचा जादा मोबदला द्यावा लागत आहे. पावसाने खरीपातील पिकाला काही ठिकाणी जीवदान दिले. तर काही ठिकाणी पिकांचे अतोनात हाल झाले आहे.भाजीपाला पिकांला यंदाचा पावसाचा लहरीपणा खुप नडला आहे. महागडी बियाणे खरेदी करून शेतकरी वर्गाने भाजीपाला पिकांला पसंती दिली. परंतु अगोदरच्या काळात कमी पाऊस व नंतरच्या काळात मात्र पावसाची सततधार यामुळे शेतकरी वर्गाने जे भाजीपाला पिके घेतले, त्यावर पुर्णपणे कुºहाड कोसळली.१) सततधार पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांमध्ये तण मोठ्या प्रमाणात उगवल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.२) टमाटा पिकामधील निंदणीसाठी मजुरांची कमतरता.३) मजुरीसाठी दुप्पट भावाची आकारणी.४) पिके व भाजीपाला वाचविण्यासाठी बळीराजांची कसरत.यंदा खरीपांच्या मध्यंतरानंतर पावसाने संततधार स्वरु प धारण केल्यामुळे पिकाला अथवा भाजीपाल्यावर औषधे, तणनाशक औषधे फवारणी न करता आल्याने यंदा सर्व खरीपांच्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आता पावसाने उघडीप दिल्याने सर्व कामे पुर्ण करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करून पिके वाचविणार आहे.- धनंजय दाते, शेतकरी, परमोरी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी