शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:27 IST

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देजनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

मानोरी : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची घोषणा करून तीन महिने उलटले असूनही घोषणा केवळ तीन महिन्यांनंतर ही कागदावरच रेंगाळलेली असल्याने दुष्काळाची केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मागणी होत असून, यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.तसेच डोंगराळ भागातील प्राण्यांनादेखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात हरणांचे कळप, मोरांचे कळप, वानर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कळप तसेच करकोचा नावाचे तब्बल १५०हून अधिक पक्ष्यांचे जाळे हरभरा पिकाच्या शेतात हिरवा हरभरा झाड खात असल्याचे दिसून आले आहे. करकोचे नावाचे पक्ष्यांचे हे भयाण जाळे बघण्यासाठी रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना हा मनमोहक क्षण बघण्यासाठी आतुरतेने गाडी थांबून पाहत असतात.पुढच्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिकच राहण्याची शक्यता असल्याने वन्यजीव प्राण्यांचे मोठे हाल होणार असल्याने वन्यप्राणी, पक्षी ग्रामीण भागात मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्नाच्या शोधात विसावलेले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातदेखील अपुºया पावसामुळे हिरवा चारा अल्पशा प्रमाणात असल्याने घरच्या गाईना हा चारा अपुरा पडत असल्याने वन्यप्राण्यांना हिरवा चारा शोधणे कठीण होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटून ही चारा छावण्या सुरू झालेल्या नसून परिणामी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ तर शेतकऱ्यांवर येणार नाही ना असा प्रश्न दुग्ध व्यावसायिक उपस्थित करत आहे.दरवर्षी पाऊस पडल्यावर मानोरी परिसरात हिरवा चारा, गवत खाण्यासाठी पडीत जनावरे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा हीच अवस्था बिकट झालेली असून, जनावरे चाºयाच्या शोधात पडीत जागेवरसुद्धा गवत मिळणे दुरापास्त झाल्याने महागडी जनावरे रास्त दराने विकण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ