शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:27 IST

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देजनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

मानोरी : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची घोषणा करून तीन महिने उलटले असूनही घोषणा केवळ तीन महिन्यांनंतर ही कागदावरच रेंगाळलेली असल्याने दुष्काळाची केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मागणी होत असून, यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.तसेच डोंगराळ भागातील प्राण्यांनादेखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात हरणांचे कळप, मोरांचे कळप, वानर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कळप तसेच करकोचा नावाचे तब्बल १५०हून अधिक पक्ष्यांचे जाळे हरभरा पिकाच्या शेतात हिरवा हरभरा झाड खात असल्याचे दिसून आले आहे. करकोचे नावाचे पक्ष्यांचे हे भयाण जाळे बघण्यासाठी रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना हा मनमोहक क्षण बघण्यासाठी आतुरतेने गाडी थांबून पाहत असतात.पुढच्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिकच राहण्याची शक्यता असल्याने वन्यजीव प्राण्यांचे मोठे हाल होणार असल्याने वन्यप्राणी, पक्षी ग्रामीण भागात मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्नाच्या शोधात विसावलेले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातदेखील अपुºया पावसामुळे हिरवा चारा अल्पशा प्रमाणात असल्याने घरच्या गाईना हा चारा अपुरा पडत असल्याने वन्यप्राण्यांना हिरवा चारा शोधणे कठीण होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटून ही चारा छावण्या सुरू झालेल्या नसून परिणामी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ तर शेतकऱ्यांवर येणार नाही ना असा प्रश्न दुग्ध व्यावसायिक उपस्थित करत आहे.दरवर्षी पाऊस पडल्यावर मानोरी परिसरात हिरवा चारा, गवत खाण्यासाठी पडीत जनावरे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा हीच अवस्था बिकट झालेली असून, जनावरे चाºयाच्या शोधात पडीत जागेवरसुद्धा गवत मिळणे दुरापास्त झाल्याने महागडी जनावरे रास्त दराने विकण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ