शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:27 IST

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देजनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

मानोरी : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचंड वाढ झाल्याने जनावरांना तापासारख्या भयंकर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाची घोषणा करून तीन महिने उलटले असूनही घोषणा केवळ तीन महिन्यांनंतर ही कागदावरच रेंगाळलेली असल्याने दुष्काळाची केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची मागणी होत असून, यात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.तसेच डोंगराळ भागातील प्राण्यांनादेखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात हरणांचे कळप, मोरांचे कळप, वानर, विविध प्रकारच्या पक्ष्यांचे कळप तसेच करकोचा नावाचे तब्बल १५०हून अधिक पक्ष्यांचे जाळे हरभरा पिकाच्या शेतात हिरवा हरभरा झाड खात असल्याचे दिसून आले आहे. करकोचे नावाचे पक्ष्यांचे हे भयाण जाळे बघण्यासाठी रस्त्याने जाणाºया वाहनचालकांना हा मनमोहक क्षण बघण्यासाठी आतुरतेने गाडी थांबून पाहत असतात.पुढच्या काही दिवसात उन्हाची तीव्रता अधिकच राहण्याची शक्यता असल्याने वन्यजीव प्राण्यांचे मोठे हाल होणार असल्याने वन्यप्राणी, पक्षी ग्रामीण भागात मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्नाच्या शोधात विसावलेले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातदेखील अपुºया पावसामुळे हिरवा चारा अल्पशा प्रमाणात असल्याने घरच्या गाईना हा चारा अपुरा पडत असल्याने वन्यप्राण्यांना हिरवा चारा शोधणे कठीण होणार आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटून ही चारा छावण्या सुरू झालेल्या नसून परिणामी जनावरे स्वस्तात विकण्याची वेळ तर शेतकऱ्यांवर येणार नाही ना असा प्रश्न दुग्ध व्यावसायिक उपस्थित करत आहे.दरवर्षी पाऊस पडल्यावर मानोरी परिसरात हिरवा चारा, गवत खाण्यासाठी पडीत जनावरे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा हीच अवस्था बिकट झालेली असून, जनावरे चाºयाच्या शोधात पडीत जागेवरसुद्धा गवत मिळणे दुरापास्त झाल्याने महागडी जनावरे रास्त दराने विकण्याची परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ