शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:10 IST

महापालिकेने पाणी आरक्षणाचे योग्य नियोजन केले, त्यातच मुकणे धरणातून ऐनवेळी पाणी उपलब्ध झाल्याने शहराला टंचाईला सामोरे जावे लागलेले नाही. मात्र आता महापालिकेची ही बचतच प्रशासकीय पातळीवर अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिकेने पाणी आरक्षणाचे योग्य नियोजन केले, त्यातच मुकणे धरणातून ऐनवेळी पाणी उपलब्ध झाल्याने शहराला टंचाईला सामोरे जावे लागलेले नाही. मात्र आता महापालिकेची ही बचतच प्रशासकीय पातळीवर अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. महापालिकेने जरी पाणीबचत केली तरी ग्रामीण भागासाठी एखादे आवर्तन मिळू शकते, अशी भूमिका जलसंपदा विभागाचे अधिकारी घेत आहेत. याचदरम्यान, गुरुवारी (दि.१६) विभागीय आयुक्तांकडे पाण्याच्या विषयावर बैठक होत असून, यात महापालिकेवर पाणीकपात करण्याची सूचना केली जाण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी महापालिकेला ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणात देण्यात आले होते. यात गंगापूर धरणातून ४२००, दारणा धरणातून ४०० तर मुकणे धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचा समावेश आहे. दारणा धरणातून यंदा महापालिकेला जादा पाणी देण्यात आले असले तरी महापालिकेत चेहेडी येथे मुळात पाण्याचा उपसा करण्याची क्षमता कमी आहे त्यातच पाण्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि अन्य भागाचे मलयुक्त पाणी येत असल्याने शुद्धीकरणाची अडचण निर्माण होते.मुकणे धरणाची योजना कधी पूर्ण होईल याची शाश्वती नव्हती. जून महिन्यापर्यंत योजनेच्या कामाची मुदत असली तरी काम अगोदरच पूर्ण झाले. त्यातच चाचणी प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागत असतो. परंतु प्रशासनाने महिनाभरातच चाचण्यांचे काम पूर्ण केले आणि त्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला.या सर्व पार्श्वभूमीवर शहराला वाढीव पाणीपुरवठा होत नसला तरी किमान पाणी कपातीची गरज भासली नाही. तरीही महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.नाशिक जिल्ह्यातील भावली, मुकणे, दारणातून आरक्षण असतानादेखील गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी पळवण्याचा घाट गेल्यावर्षी राजकीय नेते आणि नागरिकांनी हाणून पाडला. त्यामुळे मुख्यत्वे शहरासाठी पुरेसे पाणी शिल्लक आहे. अर्थात, पाणीकपातीची कितीही सूचना केली गेली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा सूचनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमीच आहे.सध्या शहरासाठी वेगवेगळ्या धरण समूहातून १५ हजार दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध असले तरी त्यावरच जलसंपदा विभागाची नजर आहे.शहरात पाणी कपात केली तर ग्रामीण भागासाठी एक आवर्तन देता येऊ शकते, असे काही जिल्हा प्रशासन ‘नगरकर’ अधिकारी प्रशासनाच्या गळी मारत आहेत.क्लायमेटच्या सूचनेनुसार पाऊस विलंबाने येणार असल्याने महापालिकेने पाणी जपून वापरण्याची गरज आहे, असे सांगून कपातीचा प्रस्ताव आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका