शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

दुष्काळाची छाया दाट, जनावरांना बाजाराची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 5:49 PM

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पाटोदा : कधी नव्हे इतकी भीषण दुष्काळी परिस्थिती येवला तालुक्यात निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयाबरोबरच पाणी प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चाºयाचे भाव गगनाला भिडल्याने पशुधन सांभाळणेही जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव चारा-पाण्याअभावी जीवापाड जपलेल्या जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत असून त्यांची कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याचे भयावह चित्र येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणाºया जनावरांच्या आठवडे बाजारात पहावयास मिळत आहे.येवला तालुक्यातील आठवडे बाजारात जनावरे विक्र ीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आठवडे बाजारापेक्षाही जनावरांना कसायाच्या दावणीला बांधीत असल्याचेही भयानक स्थिती आहे. दुष्काळ आणि येवला तालुका हे समीकरणच झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा पाण्याआभावी दुभत्या जनावरांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. येवला तालुक्यात आजमितीस ४७ गावे व २९ वाड्यांना टॅँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात असून दररोज पाणी मागणाºया गावांची संख्या वाढतच आहे. जेथे माणसांनाच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे अवघड बनले आहे, त्याठिकाणी जनावरे पोसणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी