शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कुटूंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:03 IST

जळगाव नेऊर : परिसरातील एरंडगाव येथे सव्वा कोटी रु पये खर्च करुन बांधण्यात आलेले सुसज्ज असे कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी आज धूळ खात पडले आहे. या केंद्रात कर्मचाºयांची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमार्फत येथे सुसज्ज दुमजली कुटुंब कल्याण उपकेंद्र बांधण्यात आले आहे. या उपकेंद्राचे रंगरंगोटीसह जानेवारी महिन्यातच काम पूर्ण झाले आहे. १९ जानेवारीला उद्घाटन झालेले हे उपकेंद्र उभारण्यास शासनाला १ कोटी २० लाख रु पये खर्च आला. स्वागतकक्ष, तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, औषध विभाग, रु ग्ण उपचार कक्ष व डॉक्टरांसाठी दुसºया मजल्यावर स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उपकेंद्राच्या परिसरात पथदिप बसविण्यात आले आहेत, परंतु ते अद्याप बंद अवस्थेत आहेत. सदर कुटुंब कल्याण उपकेंद्रासाठी आजपर्यंत एकाही चौकीदार अथवा स्वच्छता कर्मचाºयाची नेमणूक केलेली नसल्यामुळे हे रु ग्णालय धुळ खात पडले आहे. सुसज्ज इमारत झाली, परंतु या इमारतीस पक्के कुंपण नसल्याने गावातील महिला व पुरु ष इमारतीच्या आडोशाचा फायदा घेत याच ठिकाणी लघुशंका करतात तर तळीराम रात्री अंधाराचा फायदा घेत याठिकाणी मद्यपान करतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने या सुसज्ज अशा इमारतीची दुर्दशा होत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत हे गाव असल्याने परिसरातील अनेक गावांचा या गावांशी संबंध येतो. दवाखाना सुरु झाल्यास परिसरातील महिलांच्या प्रसुतीची उत्तम सोय या ठिकाणी होईल. तसेच इतर आजारांवरही प्रथमोपचार या ठिकाणी केले जातील. त्यामुळे सामान्य रु ग्णांना दिलासा मिळेल. रु ग्णालय असूनही अधिकारी व कर्मचारी नसल्याने परिसरातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी जावे लागते. अशा रु ग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे शासनाने दखल घेऊन या उपकेंद्रासाठी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करु न द्यावेत व रुग्णालयाची सेवा सुरु करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य