शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:21 IST

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ : कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तेव्हापासून नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे, त्यामुळे या भागात वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेभेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, सोनगाव, रामनगर या गावांच्या शिवारातून कडवा कॅनॉल जातो. फेब्रुवारी महिन्यात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप पाण्याचा एक थेंब आला नाही. मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने अनेक भागात हजेरी लावली होती; मात्र या गावात तुरळक पाऊस झाला. पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले असून, दिलासा देणारा पाऊस पडत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या भागाला वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी किमान एक महिन्याचे आवर्तन सोडावे.काही दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात काही अंशी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे धरण किमान ५० टक्के भरले आहे. धरणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात दारणा नदीच्या माध्यमातून सोडण्यात येत असते. ते यंदा न सोडता धरण लाभक्षेत्रातील कॅनॉल ज्या गावांमधून गेला आहे, त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक आवर्तन सोडावे आणि नागरिक, जनावरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. पावसाळा किमान दोन ते अडीच महिने बाकी असल्याने धरण क्षेत्रात परत एकदा चांगला पाऊस होऊन पुन्हा धरण भरेल. आता मात्र या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी, नागरिक यांना लागली असल्याने आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.फळबागांचा प्रश्न मार्गी लागणारकडवा धरणात ५० टक्के जलसाठा साचला आहे, अजून पावसाळा अडीच ते तीन महिने शिल्लक आहे, त्यामुळे एक आवर्तन सोडून दिले तरी पुन्हा धरण भरणार असल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा मिळेल. माणसे, जनावरे, फळबागा यांचा प्रश्न तूर्त मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे एक महिन्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई