शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:21 IST

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ : कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तेव्हापासून नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे, त्यामुळे या भागात वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेभेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, सोनगाव, रामनगर या गावांच्या शिवारातून कडवा कॅनॉल जातो. फेब्रुवारी महिन्यात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप पाण्याचा एक थेंब आला नाही. मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने अनेक भागात हजेरी लावली होती; मात्र या गावात तुरळक पाऊस झाला. पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले असून, दिलासा देणारा पाऊस पडत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या भागाला वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी किमान एक महिन्याचे आवर्तन सोडावे.काही दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात काही अंशी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे धरण किमान ५० टक्के भरले आहे. धरणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात दारणा नदीच्या माध्यमातून सोडण्यात येत असते. ते यंदा न सोडता धरण लाभक्षेत्रातील कॅनॉल ज्या गावांमधून गेला आहे, त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक आवर्तन सोडावे आणि नागरिक, जनावरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. पावसाळा किमान दोन ते अडीच महिने बाकी असल्याने धरण क्षेत्रात परत एकदा चांगला पाऊस होऊन पुन्हा धरण भरेल. आता मात्र या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी, नागरिक यांना लागली असल्याने आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.फळबागांचा प्रश्न मार्गी लागणारकडवा धरणात ५० टक्के जलसाठा साचला आहे, अजून पावसाळा अडीच ते तीन महिने शिल्लक आहे, त्यामुळे एक आवर्तन सोडून दिले तरी पुन्हा धरण भरणार असल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा मिळेल. माणसे, जनावरे, फळबागा यांचा प्रश्न तूर्त मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे एक महिन्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई