शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:21 IST

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

ठळक मुद्देगोदाकाठ : कडवा कॅनॉलला आवर्तन सोडण्याची मागणी

सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तेव्हापासून नागरिक पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे, त्यामुळे या भागात वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेभेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, सोनगाव, रामनगर या गावांच्या शिवारातून कडवा कॅनॉल जातो. फेब्रुवारी महिन्यात शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. तेव्हापासून अद्याप पाण्याचा एक थेंब आला नाही. मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने अनेक भागात हजेरी लावली होती; मात्र या गावात तुरळक पाऊस झाला. पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपत आले असून, दिलासा देणारा पाऊस पडत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या भागाला वरदान ठरलेल्या कडवा कॅनॉलला पिण्याच्या पाण्यासाठी किमान एक महिन्याचे आवर्तन सोडावे.काही दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात काही अंशी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे धरण किमान ५० टक्के भरले आहे. धरणातील पाणी गोदावरी नदीच्या पात्रात दारणा नदीच्या माध्यमातून सोडण्यात येत असते. ते यंदा न सोडता धरण लाभक्षेत्रातील कॅनॉल ज्या गावांमधून गेला आहे, त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एक आवर्तन सोडावे आणि नागरिक, जनावरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. पावसाळा किमान दोन ते अडीच महिने बाकी असल्याने धरण क्षेत्रात परत एकदा चांगला पाऊस होऊन पुन्हा धरण भरेल. आता मात्र या गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा शेतकरी, नागरिक यांना लागली असल्याने आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.फळबागांचा प्रश्न मार्गी लागणारकडवा धरणात ५० टक्के जलसाठा साचला आहे, अजून पावसाळा अडीच ते तीन महिने शिल्लक आहे, त्यामुळे एक आवर्तन सोडून दिले तरी पुन्हा धरण भरणार असल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा मिळेल. माणसे, जनावरे, फळबागा यांचा प्रश्न तूर्त मार्गी लागेल अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे एक महिन्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई